मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाची दडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2020
Total Views | 51

मुंबई तलावक्षेत्र प्रातिन


मुंबई :
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होण्यासाठी १० एमएलडी पाण्याची पाण्याची आवश्यकता आहे. पण पावसाने दडी मारली तर पाणीपुरवठ्याचे काय, याची चिंता आता भेडसावू लागली आहे.


तलावक्षेत्रात पावसाने दमदार सुरु केल्याने तलावात पाणीसाठा वेगाने वाढत होता. मात्र सध्या पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांची तहान भागवणारे तलाव मागील वर्षीच्या तुलनेत फक्त तीस टक्केच भरले आहेत. त्यामुळे मुंबईला आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तुळशी आणि विहार हे तलाव भरून वाहण्याच्या पातळीपर्यंत आले आहेत. एक ते दोन दिवसांच्या जोरदार पावसात हे तलाव ओसंडून वाहू शकतील. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या तुलनेत हे तलाव खूप लहान असून त्यांची पाणीसाठवण क्षमता कमी आहे. त्यामुळे भातसासह अन्य पाच तलाव पूर्ण भरणे आवश्यक आहे.




पालिकेने दिलेल्या तलावातील पाणी पातळीनुसार सर्व तलावांमध्ये सोमवारी सुमारे चार लाख दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सर्व तलाव पूर्ण भरण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. सध्याच्या तलावातील पाणी साठ्यानुसार आणखी तब्बल दहा लाख पन्नास हजार दशलक्ष लिटर कमी पाणी आहे. मागील वर्षी जुलैमध्ये तुळशी, तानसा, मोडकसागर, विहार हे चार तलाव भरले होते. मागील वर्षी तुळशी तलाव १२ जुलै, तानसा २५ जुलै मोडकसागर २६ जुलै, विहार ३१ जुलै, मध्य वैतरणा २५ ऑगस्ट, अप्पर वैतरण ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरून वाहिले होते तर भातसा पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. या तुलनेत यंदा अद्याप एकही तलाव भरलेला नाही. जुलैमध्ये व ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ५० टक्के तलाव भरल्यास तसेच एक ऑक्टोबर रोजी तलाव शंभर टक्के भरलेले असणे आवश्यक आहे.



जुलैमधील एकूण पाणीसाठा


सन २०२० : ३,९७,६०७ दशलक्ष लिटर
सन २०१९ : ७,५१,१९८ दशलक्ष लिटर
सन २०१८ : ११,२३,३७७ दशलक्ष लिटर
@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा
जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

जर्मनीमध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये होणार रोजगाराच्या संधी उपलब्ध: मंगल प्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत ..

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

हरिद्वार येथे अखिल भारतीय शास्त्र स्पर्धेला सुरुवात

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली आणि पतंजली विद्यापीठ, हरिद्वार यांच्या संयुक्त विद्यमाने ६२ वी अखिल भारतीय शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ ते २१ मार्च दरम्यान हरिद्वार येथे होत असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सत्रात पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण यांनी सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती अध्यात्म, विज्ञान आणि संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, जी सत्यतेवर आधारित आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमा..

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

पत्नीने आंधळ्यासारखं प्रेम करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला खून! ड्रममध्ये ठेवण्यात आला मृतदेह, पत्नीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

Saurav Murder उत्तर प्रदेशातील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात एका पत्नीने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यावरील असणारे लोखंडी झाकण सिमेंटचा लेप देऊन बंद करण्यात आले. कोणालाही कसलाही संशय येऊ नये म्हणून, पत्नी तिच्या पतीच्या मोबाईलवरून त्याच्या जवळच्या लोकांना सतत मेसेज आणि कॉल करत. या संबंधीत घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी जाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनास..