चीनमध्ये कोरोना मार्चमध्येच आटोक्यात !

    28-Jun-2020
Total Views | 242
Xi_JingPing_1  




वॉशिंगटन : जगभरात कोरोना रुग्ण संख्या आता एक कोटीच्या घरात गेली आहे. केवळ १८० दिवसांत कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले. ३१ डिसेंबर २०१९ रोजी चीनतर्फे जागतिक आरोग्य संघटनेला याबद्दल प्रथम माहिती देण्यात आली होती. त्यावेळी चीनमध्ये ५४ रुग्ण होते. तीन महिन्यांनी दोनशेहून अधिक देशात कोरोनाने फैलाव केला आहे.


या महामारीची सुरुवात जरी चीनमध्ये झाली मात्र, अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि ब्रिटेन या देशांना जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक फटका बसला आहे. या देशांमध्ये एकूण कोरोना बाधितांपैकी ५३ टक्के म्हणजेच ५३ लाख २८ हजार ४४९ रुग्ण आहेत. चीनमध्ये ६ मार्च २०२० नंतर दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण शंभरहून कमी झाले. तीन महिन्यांतच कोरोनावर नियंत्रण मिळवले. आत्तापर्यंत तिथे ८३ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. त्यात मृत्यूचा दर हा खूपच कमी होता. चीनमध्ये कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला. 


संक्रमणाचा वेग पाहिल्यास २५ लाख कोरोना रुग्ण हे सुरुवातीच्या १११ दिवसांत आढळले. मात्र, पुढील ६७ दिवसांत कोरोनाचे ७५ लाख रुग्णसंख्या वाढली, जगभरात कोरोनाच्या संक्रमणाची संख्याच इतकी आहे की, अनेक देशांची लोकसंख्याही त्याहून कमी आहे. १४४ असे देश आहेत, तिथली लोकसंख्या ही एक कोटींच्या खाली आहे. इस्त्रायल, युएई, ऑस्ट्रीया, बेलारुस आदी देशांचा यात सामावेश होतो. 


जगभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५३ लाखांहून अधिक आहे. जगात कोरोना रिकव्हरी रेट हा ५४.०८ टक्के इतका आहे. प्रत्येकी शंभर रुग्णांमागे ५४ रुग्ण बरे झाले आहते. जगातील सर्वाधिक प्रभावी देशांमध्ये सर्वात जास्त रिकव्हरी रेट हा रशियाचा ६१.६६ टक्के इतका आहे. ब्राझील ५४.४९ टक्के आणि अमेरिकेचा ४१.८६ टक्के इतका आहे. मात्र, कोरोनाने जगभरात पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जगाचा मृत्यू दर हा पाच टक्क्यांवर आहे. ब्रिटेन १४.०३ टक्के अमेरिका ४.९९ टक्के, ब्राझील ४.३८ टक्के, भारत ३.०७ टक्के, असे विविध देशांचे मृत्यूदर आहेत. सर्वात कमी मृत्यू दर असलेला देश रशिया आहे. तिथल्या मृत्यूदराचे प्रमाण हे १,४२ टक्के आहे. 






अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121