धारावीतील हाय रिस्क झोनमध्ये क्वारंटाईन क्षमतेत वाढ

    09-May-2020
Total Views | 35

dharavi_1  H x




मुंबई
: धारावीतील हाय रिस्क झोनमध्ये क्वारंटाईन क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. धारावीत सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित सापडत आहेत. या परिस्थतीत क्वारंटाईन क्षमता वाढवा अशा सूचना मुंबईत पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मुंबई महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


मुंबईत वाढत चाललेला कोरोना संसर्ग चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. या पथकाने मुंबईतील वरळी, धारावी आदी हाय रिस्क भागांची पाहणी केली. यावेळी वरळी कोळीवाडा हे देशातील कोरोनामुक्तीचे एक उत्तम उदाहरण होऊ शकते, असा विश्वास या पथकाने व्यक्त केला होता. वरळी कोळीवाड्याप्रमाणे धारावीतील हाय रिस्क झोनमधल्या लोंकाना क्वारंटाईन करण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवा अशा सूचनाही या पथकाने केल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. केंद्रीय पथकाने केलेल्या सूचनेनुसार आम्ही धारावीत क्वारंटाईन क्षमता वाढविली असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने आपल्या पाहणीतील निष्कर्ष मुख्यमंत्र्यासमोर मांडले. यात प्रामुख्याने डोअर टू डोअर सर्व्हेवर भर दिला जावा, त्यासाठी स्वंयसेवकांची संख्या वाढविण्यात यावी अशा सूचनाही पथकाने केल्या आहेत. त्याचीही अंमलबजावणी धारावीत केली जात असल्याचे सहाय्यक आयुक्त दिघावकर यांनी सांगितले.


धारावीत दिवसभरात २५ नवे रुग्ण


धारावीत गेल्या २४ तासांत २५ नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ८३३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत गेल्या २४ तासांत एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. मुस्लिम नगर , माटुंगा लेबर कॅम्प , इंदिरा नगर , लक्ष्मी चाळ , जनता सोसायटी , सर्वोदय सोसायटी , सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंची कुरवे नगर, या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने सापडले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121