पालघर झुंडबळी : राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    01-May-2020
Total Views | 62

Supreme Court_1 &nbs

पालघर झुंडबळी : राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश


नवी दिल्ली : पालघर झुंडबळीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यात तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिले. पालघर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे अथवा न्यायालयीन देखरेखीखालील एसआयटीकडे सोपविण्यात यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील पालघर येथे दोन संत आणि त्यांच्या वाहनचालकाचे झुंडीने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सदर प्रकाराची चौकशी राज्य सरकारने सीआयडीकडे सोपविली आहे. मात्र, हे अतिशय गंभीर प्रकरण असून त्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआआयटी स्थापन करून त्यांच्याकडे तपास सोपविण्यात यावा, अशी विनंती वकील शशांक शेखर झा यांनी एका जनहित याचिकेद्वारे केली आहे.

 

याचिकेवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायलयाने मान्य केले असून शुक्रवारी न्यायमूर्ती अशोक भुषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने कोणताही सध्या सुरू असलेल्या तपासास स्थगिती देण्याविषयीचा कोणताही आदेश जारी केला नाही. मात्र, राज्य सरकारला तपासाच्या प्रगतीचा अहवाल एका महिन्यात सादर करण्यास सांगितले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनतर होणार आहे.

 

सदर झुंडबळीस पोलिसांची संमती होती का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेमुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला असून त्याच पोलिसांमार्फत होणाऱ्या प्रकरणाच्या पुढील तपासावरही विश्वास ठेवणे अशक्य झाले आहे, कारण पोलिसांनी जमावास रोखण्यासाठी काहीही केले नसल्याचे चित्रफितींमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली असून त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना नोटीसही बजाविली आहे. लॉकडाऊन असतानाही एवढा मोठा जमाव जमणे, यावरून ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय येतो, याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

 

सदर प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी होणे गरजेचे आहे, त्यासाठी दिल्लीतील साकेत येथील जलदगती न्यायालयाकडे प्रकरण सोपविण्यात यावे. तसेच घटनास्थळी हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121