आनंदवार्ता ! लाॅकडाऊनमध्ये कोकण किनारपट्टीवरुन कासवांची ११ हजार पिल्ले समुद्रात रवाना

    01-May-2020   
Total Views | 579
sea turtle _1   
 
 
 

वन विभाग आणि स्थानिक कासवमित्रांचे यश

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनच्या कठीण परिस्थितीतही कोकण किनारपट्टीवरुन कासवांची ११ हजार ५१३ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. गेल्या दोन दशकापासून कोकणातील काही किनाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने समुद्री कासवांची संवर्धन मोहिम राबविली जात आहे. यंदा सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २३३ घरटी आढळली आहेत. त्यामधून लाॅकडाऊनच्या गेल्या दीड महिन्यात ११ हजाराहून अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली असून अजूनही काही घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडलेली नाहीत. त्यामुळे पिल्लांच्या संख्येत निश्चितच वाढ होणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा किनाऱ्यांच्या समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. २००३ साली चिपळूणच्या 'सह्याद्री निसर्ग मित्र' या संस्थेने वन विभागाच्या सहकार्याने सागरी कासवांच्या संवर्धन मोहिमेला सुरूवात केली. आता संवधर्नाचे हे काम वन विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने पाहिले जाते. याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मारळ, दिवेआगर आणि हरिहरेश्वर चार किनाऱ्यांवर कासवाची एकूण १५ घरटी आढळून आली असून त्यामध्ये १ हजार ५४५ अंडी सापडल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना दिली. लाॅकडाऊनच्या गेल्या महिन्याभरात या अंड्यांमधून बाहेर पडलेली ४८५ पिल्ले आम्ही समुद्रात सोडल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
 
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग,देवगड, सापळेबाग, सागरतीर्थ, उभा दांडा, मोचेमाड, दाभोळी, आरवली, वेळागर, वायंगणी या दहा किनाऱ्यांवर कासवाची ५९ घरटी आढळून आल्याची माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी 'महा MTB' ला दिली. त्यामध्ये आढळलेल्या एकूण ६ हजार ४०९ अंड्यांमधून आजतागायत ४ हजार ७६७ पिल्ले समुद्रात सोडल्याचे त्यांनी सांगितले. अजून काही अंडी परिपक्व होणे शिल्लक असल्याने पिल्लांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. रत्नागिरी जिल्ह्यात कासवांची घरटी होणाऱ्या किनाऱ्यांची संख्या इतर दोन जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. यंदा येथील १३ किनाऱ्यांवर कासवाची १५९ घरटी सापडली आहेत. त्यामध्ये आढळलेल्या १६ हजार ७१० अंड्यांमधून लाॅकडाऊनच्या गेल्या महिन्याभरात ६ हजार २६१ पिल्ले बाहेर पडली आहेत. त्यांना समुद्रात सोडण्याचे काम वेळोवेळी स्थानिक कासवमित्र करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची माहिती आम्हाला वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन निलख, प्रियंका लगड आणि वैभव बोराटे यांनी दिली.
 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121