मुंबईतील वाघ-सिंह-बिबट्यांच्या आहारात बदल

    03-Apr-2020   
Total Views | 143
tiger_1  H x W:
 
 

म्हशीचे मांस मिळत नसल्याने कोंबडीचा आहार

 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लाॅकडाऊनमुळे मुंबईतील देवनार कत्तलखान बंद असल्याने म्हशीचे मांस उपलब्ध होत नाही आहे. या परिस्थितीत बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' आणि भायखळ्याच्या 'वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालया'तील (राणीची बाग) मासांहारी प्राण्यांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. पिंजराबंद असलेले वाघ, सिंह, बिबटे, कोल्हे, तरस या प्राण्यांना आता म्हशीच्या मांसाऐवजी कोंबडीचे मांस खाऊ घालण्यात येत आहे.
 
 
 
मुंबईतल्या लाॅकडाऊनचा परिणाम पिंजराबंद वन्यजीवांच्या आहारावर देखील पडला आहे. नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील पिंजराबंद अधिवासामधील मासांहारी वन्यजीवांच्या आहारात बदल करण्यात आला आहे. या प्राण्यांना म्हशीचे मांस खादय म्हणून देण्यात येते. या मांसाचा पुरवठा देवनारच्या कत्तलखान्यातून होतो. मात्र, आता लाॅकडाऊनमुळे कत्तलखाना बंद झाला आहे. परिणामी म्हशीचे मांस मिळत नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्राण्यांना आता कोंबडीच्या मांसाचा खुराक सुरू केला आहे. राणीबागेत प्रत्येकी दोन वाघ, बिबटे, तरस आणि चार कोल्हे आहेत. तर नॅशनल पार्कमध्ये पिंजराबंद अधिवासात वाघ, बिबटे आणि सिंह मिळून २० मांसभक्षी प्राणी आहेत.
 
 
 
 
यासंदर्भात राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांंनी सांगितले की, आमच्याजवळील २० मांसभक्षी प्राण्यांसाठी दररोज १०० ते १२० किलो मांस लागते. पंरतु, लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देवनार कत्तलखान बंद असल्याने म्हशीच्या मांसाच्या अनुपलब्धतेमुळे आम्ही प्राण्यांना खाण्यासाठी कोंबडीचे मांस सुरु केले आहे. आज आम्हाला मांसाची निर्यात करणाऱ्या एका निर्यातदाराकडून म्हशीचे गोठलेले (फ्रोझन) मांस मिळाले असल्याचे पेंठेंनी सांगितले. राणीच्या बागेतील मांसभक्षी प्राण्यांना देखील कोंबडीचे मांस देत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. कोमल राऊळ यांनी दिली. याठिकाणी दररोज जवळपास ५० किलो मांसाची आवश्यकता असते. म्हशीचे मासांपेक्षा कोंबडीच्या मांसामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असल्याचे राऊळ यांनी नमूद केले. राणीबाग प्रशासनही गोठवलेले म्हशीचे मांस मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121