वरळी आणि धारावीत ड्रोनद्वारे पोलिस देणार सूचना!

    14-Apr-2020
Total Views | 20

drone cam_1  H


कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या धारावी आणि वरळी परिसरातील नागरिकांना ड्रोनद्वारे दिल्या जाणार सूचना!


मुंबई : मुंबईतील दाट लोकवस्ती असेलेल्या धारावी आणि वरळी कोळीवाड्यांसारख्या भागांवर आता ड्रोनची करडी नजर असणार आहे. या भागांमध्ये मुंबई पोलिस ड्रोनला स्पीकर लावून त्याद्वारे नागरिकांना गर्दी करु नका, घरीच बसा अशा सूचना देणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरळी कोळीवाड्याची पाहणी करत या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.


गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले की, 'मुंबईतील दाटलोकवस्ती असलेल्या धारावी, वरळी कोडीवाडा या सारख्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या भागात स्पीकर ड्रोनच्या माध्यमातून लोकांना सूचना देण्यात येणार आहे.' कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता ड्रोनचा वापर मुंबई शरहातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात केला जात आहे. ५ ते ६ ड्रोन मुंबईत आहे, असे त्यांनी सांगितले.


तसेच, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, घराच्या बाहेर पडू नये, फक्त भाजीपाला आणि किराणा घेण्यासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. 'घरी रहा सुरक्षित रहा' हा संदेश देण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. लोकांना वारंवार आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी सहकार्य केले जात आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याची खंत गृहमंत्र्यांनी बोलून दाखवली.
अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121