विकृतांना कायद्याची, पोलिसांची भीती उरली नाही का? : चित्रा वाघ

    03-Feb-2020
Total Views | 178

vardha chitra wagh_1 
 
वर्धा : सोमवारी वर्धामधील हिंगणघाट येथे तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आधी जालनामध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला आणि आता एका महिलेला भर रस्त्यात जाळून टाकण्यात आले. तर, महाराष्ट्रामधील सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का? असा सवाल महिलांकडून करण्यात येत आहे. तसेच, भाजप नेत्या चित्र वाघ यांनी विकृतांना कायद्याची आणि पोलिसांची भींती उरली नाही का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
 
 
"राज्यामध्ये कायद्याचे धिंडवडे निघत आहेत. विकृतांना कायद्याची पोलिसांची भिती उरलेली दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये स्वत: लक्ष घालून आरपीवर कडक कारवाई करावी आणि पिडीतेला न्याय मिळवून द्यावा." अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, 'महिला सुरक्षा फक्त भाषणात नको तर प्रत्यक्षात हवी ही राज्यातील भगिनींना अपेक्षा आहे.' असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121