ठाकरे-पवार सरकारला दणका : अर्णबची पोलीस कोठडी कोर्टाने नाकारली

    05-Nov-2020   
Total Views | 1104


qt_1  H x W: 0


अलिबाग : अन्वय नाईक या कथित आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटकेनंतर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावण्यात आली. अर्णब गोस्वामींना 'पोलीस कोठडी' ऐवजी 'न्यायालयीन कोठडी' देण्यात आली आहे.


अन्वय नाईक यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र अन्वय नाईक मृत्यूप्रकरणात पुराव्याअभावी तत्कालीन सरकारने तपास बंद करण्याचा निर्णय करून न्यायालयात अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला होता. सातत्याने ठाकरे सरकारवर आसूडप्रहार करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना मोठ्या फौजफाट्यासह बुधवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कायद्यानुसार पोलिसांनी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले. अर्णबची चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. पोलिसांना तपास करण्यासाठी न्यायालयाला विनंती करून पोलीस कोठडी मागून घ्यावी लागते. पोलिसांची विनंती नाकारून अर्णब यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कोर्टाच्या पहिल्याच पायरीवर मोठी चपराक बसली आहे. तसेच न्यायालयात तपास बंद करण्याविषयीचा अहवाल सादर केलेला असताना, परस्पर तपासप्रक्रिया कशी सुरू करण्यात आली, असा प्रश्न सुनावणीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते. त्याविषयी सुनावणी गुरुवारी होईल. तसेच न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे आता जामिनासाठी अर्ज करण्याचा अर्णब यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात काय होते, हे याप्रकरणी निर्णायक ठरेल. तसेच जामीन अर्जावर सुनावणी होऊन अर्णब गोस्वामी यांचा जामीन मंजूर होतो का, हे देखील आपल्याला गुरुवारी समजेल.

सोमेश कोलगे 

महविद्यालयीन विद्यार्थी आहे. महाराष्ट्रातील नावाजलेल्या वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांतून सहभाग आणि प्राविण्य संपादन केले आहे. कायदा, न्यायशास्त्र विषयाची विशेष आवड.  संघाचा स्वयंसेवक . विविध विधायक कारणांसाठी न्यायालय तसेच  महिला आयोग, ग्राहक मंच अशा अर्ध-न्यायिक संस्थांकडे जनहितार्थ याचिका.  माहिती अधिकार, २००५  आणि तत्सम अधिकारांचा सकारात्मक उपयोग.

अग्रलेख
जरुर वाचा
राम दरबारात विराजले मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम

राम दरबारात विराजले मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम

गंगा दशहराचे औचित्य साधून वैदिक मंत्रोच्चारात अयोध्येतील श्रीराम मंदिरातील राम दरबाराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी संपन्न झाला. या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विशेष उपस्थिती होती. पहिल्या मजल्यावरील राम दरबारात येणाऱ्या भाविकांना प्रभू श्रीराम यांच्यासह माता सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नन यांचे दर्शन घेता येईल. यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघाली होती. सर्वत्र रामनामाचा जयघोष होत होता. अयोध्येत गेल्या तीन दिवसांपासून प्राणप्रतिष्ठेचा धार्मिक विधी सुरू होता. ..

अवधूत गुप्तेंच्या

अवधूत गुप्तेंच्या 'आई' अल्बममधील 'तू नसशील तर' भावस्पर्शी गाणे प्रदर्शित!

आईच्या मायेचा स्पर्श मनाला भावतो आणि त्याच नात्याची गुंफण करणारे ‘तू नसशील तर’ हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावभावनांनी भरलेल्या अल्बममधील हे तिसरे गाणे असून, त्यामधून आई आणि मुलाच्या नात्याची हळवी, खोल आणि मनाला भिडणारी भावना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे गाणे पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यातील भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होत आहेत. अवधूत गुप्ते यांनी हे गाणे स्वतः संगीतबद्ध केले असून त्याचे गायनही त्यांनीच केले ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121