विश्वास कसा ठेवणार?

    29-Oct-2020   
Total Views | 144

Joe Biden_1  H
 
 
आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जो बायडन यांनी मोदी सरकारवर नेहमीच टीका केली. भारत सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्तांना देशात आसरा देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू केला. मात्र, बायडन यांनी ‘सीएए’विरोधात विधाने केली. तसेच बायडन यांनी ‘एनआरसी’ आणि काश्मीर मुद्द्याच्या अनुषंगानेदेखील भारतविरोधी वक्तव्ये केली.
 
 
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अर्ली व्होटिंग सिस्टिम’अंतर्गत मतदानाला प्रारंभ झालेला असून आतापर्यंत सुमारे सहा कोटी लोकांनी त्यात भाग घेतला. अशा परिस्थितीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकन मतदाते आणि प्रामुख्याने भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याचे दिसते. नुकतीच अध्यक्षीय निवडणुकीतील चर्चेची फेरी पार पडली व त्यात विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरुन भारताचे नाव घेत टीका केली. याविषयी ट्विटरवर ते म्हणाले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख वाईट अर्थाने केला. तुम्ही तुमच्या मित्रांशी अशी चर्चा करु शकत नाही, तसेच असे करुन तुम्ही हवामान बदलाचा प्रश्नही सोडवू शकत नाही. कमला हॅरिस आणि मी भारत व अमेरिकेतील भागीदारीत आदर-सन्माला अधिकाधिक महत्त्व देणे सुनिश्चित करु.” अर्थातच जो बायडेन यांनी हे ट्विट भारतीय अमेरिकन मतदारांनी आपल्यामागे यासाठीच केल्याचे स्पष्ट होते. बायडेन भारतीय अमेरिकनांना आकर्षित करण्यासाठी शक्य ते सर्वच प्रयत्न करत आहेत आणि या कामात जागतिक माध्यमांतील वामपंथी गटही त्यांची पुरेपूर पाठराखण करत आहेत. परंतु, कित्येक भारतीय अमेरिकनांनी भूतकाळातील गोष्टी विसरलेल्या नाहीत. बायडन यांचा डेमोक्रेटिक पक्ष मोदी सरकार आणि त्यांच्या लोकप्रियतेने चिडल्याचे व त्याने मोदींना हीन लेखण्यात कोणतीही कसर बाकी न ठेवल्याचे भारतीय अमेरिकनांना चांगलेच आठवते.
 
 
आपल्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जो बायडन यांनी मोदी सरकारवर नेहमीच टीका केली. भारत सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील धार्मिक अत्याचारग्रस्तांना देशात आसरा देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू केला. मात्र, बायडन यांनी ‘सीएए’विरोधात विधाने केली. तसेच बायडन यांनी ‘एनआरसी’ आणि काश्मीर मुद्द्याच्या अनुषंगानेदेखील भारतविरोधी वक्तव्ये केली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ हटवले तर हा भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या परंपरेविरोधातील निर्णय असल्याचे ते म्हणाले. भारत सरकारने काश्मिरी नागरिकांच्या हक्क-अधिकारांना पुन्हा बहाल केले पाहिजे, शांततापूर्ण विरोध-निदर्शनांना बंदी घालणे किंवा इंटरनेटवरील बंदी लोकशाहीसाठी हानिकारक असल्याचे बायडन म्हणाले. इथेच जो बायडन यांची भारताबद्दलची नेमकी भूमिका काय ते स्पष्ट होते. सोबतच बायडन भारताच्या अंतर्गत विषयात थेट हस्तक्षेप करत असल्याचे किंवा त्यासाठी उतावीळ झाल्याचेही यातून समजते. परिणामी, जो बायडन यदाकदाचित सत्तेत आलेच तर ते भारतविषयक धोरणांमध्ये कसले कसले अडथळे निर्माण करतील, याचेच संकेत यातून मिळतात. तथापि, भारत व भारतीयांच्या जोरदार विरोधानंतर जो बायडन यांना आपली विधाने मागेदेखील घ्यावी लागली होती.
 
 
दरम्यान, जो बायडन यांनी भारतीयांना अधिकाधिक आकर्षिक करण्यासाठी आणखी एक आमिषही दाखवले, ते म्हणजेच ‘एच1बी’ व्हिसाचे. ‘एच1बी’ व्हिसावरील बंदी हटवणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, वास्तवात जो बायडन ना भारताचे मित्र होते ना कधी होतील. याचे मूळ कारण १९९२ सालापर्यंत मागे असल्याचे दिसते. जो बायडन यांनी अमेरिकन सिनेटवर दबाव टाकला व रशिया आणि भारतादरम्यान होणारा 24 अब्ज डॉलर्स मूल्याच्या क्रायोजेनिक इंजिनाचा करार रोखून धरला. हा करार झाला असता तर आज अंतराळात भारत जे नवनवे पराक्रम करत आहे, ते २० वर्षांआधीच झाले असते. परंतु, जो बायडन यांच्या एका डावाने भारताला अंतराळ तंत्रज्ञानात २० वर्षे मागे पछाडले. दुसरीकडे भारतीय वंशाच्या असूनही कमला हॅरिस यांचे प्रामाणिकत्व भारताबद्दल जरा कमीच दिसते. काश्मीर धोरणावर सातत्याने केली जाणारी टीका असो वा अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यानचे पूर्वीचे संबंध सुरळीत करण्याबद्दल असो, कमला हॅरिस यांनी सातत्याने भारतविरोधी बाजूला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर भारताने काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो अमेरिकेच्या मूल्य आणि निकषांविरोधात असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. डेमोक्रेट्स राजनेते भारतावर टीका करण्याची एकही संधी गमावत नाहीत, मात्र, चीन व पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर जो काही धिंगाणा घातला जातो, त्यावर चुप्पी साधतात. म्हणूनच जो बायडन किंवा कमला हॅरिस यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न भारतीय अमेरिकनांसमोरही उपस्थित झाला असेलच.
 
 
 

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121