एर्दोगान यांचे शल्य आणि मुस्लीम

    06-Jan-2020
Total Views | 104


asf_1  H x W: 0


जेव्हा इराक आणि सीरियामध्ये इसिस या दहशतवादी इस्लामी संघटनेने भीषण हिंसाचार व निरापराध्यांचे हत्याकांड सुरू केले होते, तेव्हा या दोन्ही देशांतील मुस्लिमांनी थेट पश्चिमी ख्रिश्चन देशात पलायन केले. कोट्यवधी मुस्लीम हे ख्रिश्चनांच्या आश्रयाला गेलेत पण जगातील ५६ मुस्लीम देशांपैकी एकाही देशाने त्यांना त्यांच्या देशात आश्रय दिला नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.


इराक आणि सीरिया या देशांमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. इसिससारख्या आणि तालिबानसारख्या इस्लामी अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेले तेथील युद्ध आता मुस्लिमांचे अंतर्गत युद्ध ठरू लागले आहे. नुकतीच मलेशियामध्ये मुस्लीम देशांची एक परिषद झाली. त्यात तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी एक व्यथा मांडली. पण, इतर मुस्लीम देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे मुस्लिमांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान आणि सौदी अरब या मुस्लीम देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत ओरडणाऱ्या पाकिस्तानला इतर मुस्लीम देशातील मुस्लिमांच्या समस्या फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यावरून भारतात सुखेनैव जीवन जगणाऱ्या मुस्लिमांनी बोध घ्यायला हवा. पण, जोवर त्यांच्यावर बांगलादेशातील मुस्लिमांसारखी स्थिती येणार नाही, तोवर भारतातील मुस्लिमांची पाकबाबतची भावना बदलणार नाही, असे वाटते. इराक व सीरियामधील अनेक मुस्लीम हे तुर्कीमध्ये आश्रयाला आले आहेत व हा आकडा ३५ लाखांच्या वर जात आहे. या सर्व लोकांच्या राहण्यासाठी तुर्की सरकारला जो खर्च येतो, तो इतर मुस्लीम देशांनी द्यावा किंवा यात मदत करावी, असे एर्दोगान यांनी त्या मुस्लीम परिषदेत आवाहन केले. पण, त्या परिषदेतील सर्व मुस्लीम देशांनी एर्दोगान यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, असे एर्दोगान यांनीच नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे. शिवाय तुर्कीच्या आश्रयाला आलेल्या या मुस्लिमांनी त्या देशातही कायदा तोडण्याचे काम चालविले आहे, असाही एर्दोगान यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे कोणत्याच मुस्लीम देशाच्या प्रमुखाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

 

जेव्हा इराक आणि सीरियामध्ये इसिस या दहशतवादी इस्लामी संघटनेने भीषण हिंसाचार व निरापराध्यांचे हत्याकांड सुरू केले होते, तेव्हा या दोन्ही देशांतील मुस्लिमांनी थेट पश्चिमी ख्रिश्चन देशात पलायन केले. कोट्यवधी मुस्लीम हे ख्रिश्चनांच्या आश्रयाला गेलेत पण जगातील ५६ मुस्लीम देशांपैकी एकाही देशाने त्यांना त्यांच्या देशात आश्रय दिला नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. इराक आणि सीरिया देशातील हिंसाचारग्रस्त मुस्लीम हे इराण, सौदी अरेबिया, ओमान, दुबई आदी धनाढ्य मुस्लीम देशांत का गेले नाहीत, तर जवळपास सर्वच मुस्लीम देशांनी त्यांना त्यांच्या देशात प्रवेश नाकारला आहे. अफगाण, इराक, सीरिया, पाकिस्तान आदी हिंसाचारी देशातील मुस्लिमांना जर आपल्या देशात आश्रय दिला, तर ते आपल्याही देशात हिंसाचार करतील, येथील कायदा तोडतील आणि दहशतवादी कारवाया करतील व त्यांच्यामुळे देशात गृहयुद्ध होईल, अशी साधार भीती इराण व सौदी अरेबियासह अनेक देशांनी व्यक्त करून मुस्लिमांना आश्रय नाकारला आहे, हे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर हेच आश्रयाला आलेले लोक नंतर त्यांच्या देशात परत जाणार नाहीत आणि ते भार म्हणून येथेच राहतील, अशी भीती इराण, सौदी आदी देशांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांची चिंता अधिक बोलकी आहे. यातून भारतातील मुस्लीमधार्जिण्या राजकीय पक्षांनी आणि तशाच प्रवृत्तीच्या कुबुद्धीवाद्यांनी धडा घेण्याची वेळ आली आहे.

 

- मधुसूदन कुळकर्णी

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121