‘बंद राज्य सरकार पुरस्कृतच’ : मनसे

    29-Jan-2020
Total Views | 178

sandeep deshpande _1 



मुंबई
: आज बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी भारत बंद पाळण्यात येत आहे. या बंदवरून मनसेने राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तीव्र शब्दांत टीकास्र सोडले आहे. आजचा बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेने माध्यमांशी बोलतना केला आहे.


सांगली, धुळे या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले आहे. तर मुंबईत कांजुरमार्ग स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. काही ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्र व्यापारी संघटनांनी यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये शामिल न होण्याचा निर्णय घेतला असल्याने या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मनसेने मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हा सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमके तेच घडत आहे, असेही देशपांडे म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्पच्या

ट्रम्पच्या 'या' निर्णयाने उडवली मुस्लिमबहुल राष्ट्रांची झोप!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या नव्या आदेशाने अनेक मुस्लिम बहुल देशांची झोप उडवलीय. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेच्या धोक्यांचा हवाला देत अफगानिस्तान, म्यानमार, चाड, कांगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, ईराण, लीबिया, सोमालिया, सूडान आणि येमेन या १२ देशांतील व्यक्तींना प्रवेशबंदीच्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे. त्यासोबतच बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो , तुर्कमेनिस्तान आणि वेनेजुएला या सात देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर अंशतः बंदी आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121