भारतच अव्वल : मनू भाकर आणि सौरभ चौधरीला 'सुवर्ण'

    03-Sep-2019
Total Views | 32


 


नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांची कामगिरी दिवसेंदिवस चांगली होताना दिसत आहे. सध्या ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने आणखीन एक सुवर्ण पदक जिंकून भारतीय नेमबाजांनी दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेच्या मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारामध्ये भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरीने सुवर्ण पदक जिंकले आहे. याचसोबत भारताच्या नावावर आता एकूण ९ पदके असून सध्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे.

 

सोमवारी झालेल्या या अंतिम रोमांचक सामन्यामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या जोडीने भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माला १७-१५ ने असे मागे टाकत सुवर्णपदक कमावले. दुसरीकडे, १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या मिश्र गटात अपूर्वी चंदेला आणि दीपक कुमार यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मौदिगल आणि दिव्यांश पंवार यांनी कांस्य पदक पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या नेमबाजांनी सहा सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके पटकावून भारताला अव्वल स्थान मिळवून दिले आहे. भारतानंतर चीन ६ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121