वर्षानुवर्षे अमरनाथ यात्रा सुरु आहे. १ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरु झाल्यापासून आतपर्यंत ९० हजारपेक्षा अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. यासंदर्भात बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, अमरनाथ यात्रेला आमचा पाठिंबा आहे. परंतु या यात्रेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे काश्मीरच्या स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
फुटीरतावाद्यांचा कळवळा
मेहबुबा मुफ्ती यांनी फुटीरतावाद्यांबद्दल कळवळा दाखवला आहे. त्या म्हणाल्या, फुटीरतावाद्यांचा एक गट चर्चेसाठी तयार असल्याचे बोलत आहे. फुटीरतावादी चर्चेसाठी तयार असतील तर केंद्र सरकारने ही संधी वाया जाऊ देऊ नये आणि त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करावी, असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.