वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग, ६० कर्मचारी सुखरूप

    22-Jul-2019
Total Views | 29


 


मुंबई : वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली असून इमारतीत अंदाजे १०० कर्मचारी अडकले असल्याचे सांगण्यात येत होते, त्यापैकी ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आहेत.

 

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, आतापर्यंत ६० कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून बाजूची अंजुमन-ए-इस्लाम शाळाही रिकामी करण्यात आली आहे.

 

वांद्रे येथील एस. व्ही. रोडवर ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. दुपारी तीनच्या सुमारास आग लागली असून वरच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आठव्या मजल्यावर अडकलेले कर्मचारी गच्चीवर सुखरूप पोहोचल्याने अनर्थ टळला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121