शेफाली वैद्य आणि स्वरा भास्कर यांच्यात रंगले ट्विटर युद्ध

    31-May-2019
Total Views | 712


स्वरा भास्कर ही अभिनेत्री तिच्या अभिनयामुळे तर प्रसिद्ध आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांमुळे ती जास्त चर्चित असते. दरम्यान, भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर निवडणुकीत 'महा पनौती' हा पुरस्कार कोण जिंकेल असा प्रश्न पुण्यातील सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

 
 
 

ट्विटरवरून एका पोलच्या माध्यमातून शेफाली यांनी लोकांना या प्रश्नावर आपले मत देण्याचे आवाहन केले. यामध्ये तीन पर्याय देण्यात आले होते. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन, ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त आणि कायम वादाच्या भवऱ्यात अडकणारी स्वरा भास्कर. या स्पर्धेत स्वरा भास्कर विजयी झाली आहे. या विजयाचे अभिनंदन करत शेफाली वैद्य यांनी स्वराला उद्देशून हे ट्विट केले.

 
 
 
 

त्यावर स्वराने देखील शेफाली वैद्य यांना प्रत्युत्तरादाखल ट्विट केले. अखेर हे ट्विटर युद्ध संपले खरे मात्र स्वरा भास्कर अजून किती दिवस आपले असे हसे करून घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. 

 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण कहाणी! ऑपरेशन कसे पार पडले? – वाचा सविस्तर

दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121