Live Update : खान्देश पुन्हा एकदा भाजपचाच!

    23-May-2019
Total Views | 59




जळगाव : खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

 

रावेर

 

रावेर मधून भाजपच्या रक्षा खडसे व काँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील यांच्यात थेट लढत असून रक्षा खडसे या ९२ हजार ३९८ मतांनी आघाडीवर आहेत. रक्षा खडसे यांना २ लाख १४४ मते मिळाली असून पाटील यांना १ लाख १३ हजार ७४६ मते मिळाली आहेत.

 

जळगांव

 

जळगांव मतदार संघातून भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर असून पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यात थेट लढत आहे. उन्मेष पाटील हे १ लाख २ हजार ४७४ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख ६६ हजार १३९ मते मिळाली असून देवकर यांना अवघी ६३ हजार ६६५ मते मिळाली आहेत.

 

धुळे

 

धुळे मतदार संघातून भाजपचे डॉ.सुभाष भामरे आघाडीवर असून भामरे व काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात थेट लढत आहे. डॉ. भामरे हे ७५ हजार ८०६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना १ लाख ५७ हजार २९९ मते मिळाली असून पाटील यांना अवघी ८९ हजार ४६२ मते मिळाली आहेत.

 

नंदुरबार

 

नंदुरबार मतदार संघातून भाजपच्या डॉ. हिना गावित या आघाडीवर असून गावित व काँग्रेसचे के.सी.पाडवी यांच्यात थेट लढत आहे. डॉ. गावित हे १५ हजार ४७२ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ३ लाख २३ हजार १६९ मते मिळाली असून पाडवी यांना ३ लाख २३ हजार १६९ मते मिळाली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर: मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ..

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?

कठोर परिश्रम, समर्पण, ईच्छाशक्ती, ध्यास आणि आत्मविश्वास या पाच गोष्टी गाठीशी असल्या की, कोणतीही गोष्ट साध्य करणं शक्य आहे. तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी परिस्थितीवर मात करत जिद्दीने पुढे जात राहिलात तर नक्कीच यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे बिरदेव सिध्दाप्पा डोणे. घरची परिस्थिती फारच बेताची. मेंढपाळ हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. अशा परिस्थितीत बिरदेवने एक स्वप्न पाहिलं. ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. यात त्याला दोनदा अपयशही आलं. मात्र, तरीसुद..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121