स्वच्छतेत अंबरनाथ नगरपालिका राज्यात पाचवी

    06-Mar-2019
Total Views | 52


 


ठाणे : देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणात अंबरनाथ नगरपालिकेने राज्यात पाचवा तर देशात ३० वा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पालिकेच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा देशाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत अंबरनाथ नगरपालिकेचा ६७ वा आणि राज्यात १४ वा क्रमांक आला होता.

 

सलग दुसऱ्या वर्षीही नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रिनिधींनी यंदा नागरी सहभागातून प्रभावी स्वच्छता मोहीम राबवली आणि स्वच्छतेबाबतचे महत्व नागरिकांना पटवून दिले, हागणदारीमुक्त अभियानांतर्गत स्वच्छतागृहे बांधण्याची व्यापक मोहीम राबवली होती. यामुळे नगरपालिकेने यंदा पाचवा क्रमांक पटकावला आहे. नगराध्यक्षा, सर्वपक्षीय लोप्रतिनिधी, अधिकारी, सफाई कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे नगरपालिकेने स्वच्छतेबाबाबत देशात आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी यश मिळवले असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले.

 

पालिका मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छतेसाठी मेहनत घेतली, लोकप्रतिनिधींनी प्रभागात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले, तसेच ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करताना नागरिकांचेही योग्य सहकार्य मिळाल्याने यावर्षी अंबरनाथ नगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक आल्याची माहिती नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा
१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

१४ फूट x १४ फूट आकाराची कोठडी, २४ तास सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे; तहव्वूर राणाला NIA ने कुठे ठेवलंय?

(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ..

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121