औरंगाबादमधील डॉक्टरचे दहशतवादी कनेक्शन?

    05-Mar-2019
Total Views | 109

 

 
 
 
खुलताबाद : औरंगाबादमधील खुलताबाद येथून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. असा संशय एटीएसला आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून एटीएसकडून या डॉक्टरची चौकशी करण्यात येत होती. तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना या डॉक्टरने पैसे पुरवल्याचा संशयही एटीएसला आहे. या डॉक्टरच्या नावाचा खुलासा अजून एटीएसकडून करण्यात आलेला नाही.
 

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या अन्नसाठ्यात विष मिसळण्याचा कट आयएसआय (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) आणि एमआय (पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजन्स) ने आखला होता. काही दिवसांपूर्वी या कटाबाबतची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलाला दिली होती. औरंगाबादमधील या डॉक्टरचा या कटात समावेश असल्याचा संशय एटीएसला आहे.

 

सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे. भारतीय वायुसेनेने एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताने सुखरुप मायदेशी परत आणले.

 

या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला नुकसान पोहोचवण्यासाठी पाकिस्तान जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा कट आखत आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना वेळीच या कटाची माहिती मिळाल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जवानांसाठीचे अन्नपदार्थ आणि रेशन सामान खरेदी करताना सावधगिरी बाळगायला सांगितले आहे. दरम्यान, या कटाशी औरंगाबादमधील डॉक्टरचा संबंध असल्याच्या संशयावरून त्याला एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121