२४ तासांत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

    22-Mar-2019
Total Views | 28


जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात एकूण चार चकमकी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेच्या सुमारास पुन्हा शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक सुरू झाली. या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपले आहेत.

बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चे दोन दहशतवादी ठार झाले. बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. २४ तासात चार चकमकी झाल्या असून आतापर्यंत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आह. चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले आहेत.


दहशतवादी अली भाई हा पाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे. बारामुलाच्या कलंतरा परिसरात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती श्रीनगर येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल कालिया यांनी दिली आहे. चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारामुलात दहशतवाद्यांनी होळीच्या दिवशी शोधमोहीम सुरू असताना जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर काही मिनिटांच्या आत सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. परंतु, या ठिकाणी एकही भारतीय जवान जखमी झाला नाही, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121