जैश-ए-मोहम्मदशी संपर्क होता, 'त्या' काश्मिरी तरुणांची कबूली

    25-Feb-2019
Total Views | 59

 

 
 
 
 
लखनऊ : दहशतवाद विरोधी पथकाकडून उत्तर प्रदेशात दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली. 'जैश-ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होते. अशी कबुली अटक केलेल्या या दोन काश्मिरी तरुणांनी उत्तर प्रदेश पोलिसांना दिली. एटीएसने शहारनपूर येथील देऊबंद या शहरामधून या दोघांना अटक केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझी याच्याशी हे दोन काश्मिरी तरुण संपर्कात होते. अशी माहिती मिळाली आहे. अब्दुल मलिक आणि शाहनवाज अशी या दोन काश्मिरी तरुणांची नावे आहेत.
 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसांनंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये अब्दुल रशीद गाझीला कंठस्नान घालण्यात आले. अटक करण्यात आलेल्या या दोन काश्मिरी तरुणांपैकी एकाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मॅसेज सापडला. या व्हॉईस मॅसेजमध्ये मोठे काम, सामान असे शब्द ऐकू येत आहेत. शाहनवाज आणि अब्दुल मलिक हे दोन्ही तरुण एक मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत होते. त्या हल्ल्या संबंधीत हे संभाषण होते. अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली. या संभाषणात वापरण्यात आलेल्या सामान या शब्दाचा अर्थ शस्त्र किंवा स्फोटक असा आहे.

 

पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोन काश्मिरी तरुणांची चौकशी केली. तब्बल चार तास ही चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान, शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोघांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याचे कबूल केले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या तरुणांविषयीची माहिती जम्मू–काश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यापर्यंत पोहोचवली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी या दोन काश्मिरी तरुणांचा संबंध असून चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. या माहितीच्या आधारे याप्रकरणी आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.” असे ओ.पी.सिंह यांनी सांगितले.

 

शाहनवाज हा काश्मिरी तरुण गेल्या १८ महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. अब्दुल मलिक हा गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या सोबत आहे. असे शाहनवाजने पोलीस चौकशीदरम्यान सांगितले. एटीएस महासंचालक असीम अरुण यांनी ही माहिती दिली. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझी याच्या संपर्कात असल्याचे शाहनवाजने कबूल केले. जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडर्सनी या दोघांशी संपर्क साधला होता. कमांडर्सनी केलेल्या आवाहनानुसार शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दहशतवादी संघटनेत सहभागी झाले. शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोघांच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स आणि व्हॉईस मॅसेज सापडले असून ‘लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे’. असे संभाषण या व्हॉईस मॅसेजमध्ये आढळले आहे. शस्त्र घेऊन जाण्यासाठी ठिकाणाचाही उल्लेख या संभाषणात करण्यात आला आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

 

कोण आहेत हे काश्मिरी तरुण ?

 

शाहनवाज या काश्मिरी तरुणाने बीएच्या पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्याने कॉम्प्युटर कोर्सही केला आहे. शाहनवाजचे वडील कारपेंटर आहेत आणि त्याचा भाऊ शिक्षक आहे. तर अब्दुल मलिक या तरुणाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. अब्दुलचे वडील हे एक शेतकरी आहेत. उत्तर प्रदेश पोलीस या दोघांना घेऊन काश्मीरला जाणार आहेत. काश्मीरमध्ये या दोघांनी डमी ग्रेनेड लपवले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांसोबत राहिलेल्या इतर विद्यार्थांचीदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121