आंध्रप्रदेशला असणार तीन राजधान्या - जगनमोहन रेड्डी

    18-Dec-2019
Total Views | 49

j_1  H x W: 0 x


आंध्रप्रदेश : नव्या आंध्र प्रदेश राज्याच्या तीन अधिकृत राजधान्या असतील, अशी घोषणा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी मंगळवारी विधानसभेत केली. सत्तेचे आणि कामकाजाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे, परंतु आता आंध्र प्रदेशने आपली नवीन राजधानी बनवण्याची घोषणा केली आहे.


आंध्र प्रदेशच्या तीन राजधानी असतील आणि या राजधान्या स्वतंत्रपणे कार्य करतील. कार्यकारी
, न्यायिक व विधानमंडळ अशी त्यांची विभागणी केली जाईल, असे जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. तसेच राज्याला तीन राजधान्यांची गरज असून त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. याबाबत विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, या समितीच्या अहवालानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.


अमरावती (राजकीय), विशाखापट्टणम (कार्यकारी), कुरुनुल (न्यायिक) ही शहरे संभाव्य राजधानीसाठी निवडली जाणार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121