ईशान्येत पसरविल्या जात असणाऱ्या अफवांवर सैन्याचे स्पष्टीकरण

    14-Dec-2019
Total Views | 47


आर्मी _1  H x W


नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत ईशान्य भागात विरोध आहे. दरम्यान, भारतीय सैन्याबद्दल अनेक दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सैनिकांवर लोकांचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात लष्कराने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये लोकांना बनावट बातम्यांपासून सावध रहाण्याचे आवाहन केले आहे.


भारतीय लष्कराने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सामान्य लोकांना आवाहन केले आहे की
,'अशा बनावट बातम्यांपासून सावध रहा ज्या संशयास्पद लोकांद्वारे पसरविल्या जात आहेत.' लष्कराने ट्वीट करून लिहिले आहे की, "काही समाजकंटकांद्वारे सोशल मीडियावर खोट्या बातम्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. अफवा टाळा, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा त्याकडे लक्ष देऊ नका. भारतीय सेना - देशाची सेना."


'खोटा प्रसार टाळा'

भारतीय लष्कराने त्यांच्या ट्वीटद्वारे सैन्यासमोर हॅशटॅग वापरला आहे. लष्कराने ट्विटसह काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. सैन्याने फोटोवर लिहिले आहे की हजारो खोटी बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना टाळा.


अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121