...तर वाचली असती डॉ. नेहा शेख

    11-Oct-2019
Total Views | 168


वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर बुधवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. नेहा शेख (वय २५) या तरुणीचा दुचाकीवरून पडून अपघात झाला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही झालेल्या विविध अपघातांप्रकरणी सुप्रीमो कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित डॉ. नेहा शेख हिचा जीव गेला नसता, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. 

डॉ. नेहा शेख आपल्या भावासोबत ठाण्याला लग्न सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. घरी परतत असताना खराब रस्त्यामुळे तिचा अपघात झाला. पुढील महिन्यात दि. ७ नोव्हेंबर रोजी तिचे लग्न होते. तिच्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भिवंडी-वाडा-मनोर हा महामार्ग बांधा-वापरा-हस्तांतरित करा या तत्त्वावर शासनाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिला आहे. हा महामार्ग संपूर्ण खराब झाला असून याआधीही या महामार्गावर अनेक अपघात होऊन कित्येक लोकांचे बळी गेले आहेत. हा रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत करावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही काम केले जात नाही.

या निष्काळजी कंपनीविरोधात कुडूस परिसरातील स्थानिक नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करून कंपनीचा निषेध केला. संबंधित सुप्रीम कंपनी मालकावर गुन्हा दाखल केला आहे. रस्ता सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत टोल बंद राहील, असे ठोस आश्वासन पोलीस उपनिरीक्षक दोडकर यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीन तासानंतर आंदोलन मागे घेतलेया रास्ता रोको आंदोलनात सुनील पाटील, इरफान सुसे, मुस्तफा मेमण, कुडूसचे उपसरपंच गिरीश चौधरी, जितेश पाटील, सचिन पाटील, दत्तात्रेय भोईर, रामदास जाधव, स्वप्नील जाधव, शुभम जाधव, सचिन भोईर आदी हजर होते.

अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

वक्फ कायदा मंजूरीनंतर उत्तर प्रदेशात वक्फ दाव्यावर पहिली पोलीस तक्रार

Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात ..

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची

पश्चिम बंगालमधील हिंदूंसाठी धोक्याची 'ममता', मिथून चक्रवर्तींचा हल्लाबोल

Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121