ठाण्यात जिल्ह्यात १००० तळीरामांवर कारवाई

    02-Jan-2019
Total Views | 20



ठाणे - थर्टी फर्स्टला मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हचा झटका दिला आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर पोलीस परिमंडळाने रात्रभर विविध शहरातील चौकात नाक्यावर नाकाबंदी करुन दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल १ हजार तळीरामांना फौजदारी कारवाईचा बडगा उगारला. यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी, पेट्रोलिंगच्या माध्यमातून अनुचित प्रकारांना रोखण्यास पोलीस यंत्रणाला यश आले आहे.

 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणाई एकवटली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर दारूच्या नशेची झिंग चढल्यामुळे काही तळीरामांनी वाऱ्याच्या वेगाने गाड्या चालवणे, वादावाद करणे, असे काही अनुचित प्रकार केले. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठाण्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आणि दारू पिणाऱया वाहन चालकांवर कारवाई केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका

वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121