तेलतुंबडेंची याचिका न्यायालयाने फेटाळली; चार आठवड्यांचा दिलासा मात्र कायम

    14-Jan-2019
Total Views | 18



मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी तेलतुंबडे याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च नायलायाने तेलतुंबडे याची याचिका फेटाळून लावली. तेलतुंबडे याने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेदेखील तेलतुंबडेंची याचिका फेटाळून लावल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेही तेलतुंबडेला दिलासा मिळू शकला नाही.

 

आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे सांगत तेलतुंबडेने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली. यामध्ये पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्याने केली होती. दरम्यान, तेलतुंबडेच्या याचिकेवर सुनावणी करताना 'तपासाची व्याप्ती प्रचंड वाढली असल्यामुळे कार्यवाही रद्द करता येऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडेला कारवाईपासून दिलेले संरक्षण ४ आठवड्यांपर्यंत कायम ठेवले आहे.

 

काय आहे प्रकरण

 

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी वेगाने तपास करत दोषींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणात अनेक नावे समोर आली होती. यामध्ये प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडेंचा समावेश होता. या सर्वांचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. यापैकी प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, गौतम नवलखा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी आपल्यावर खोटे आरोप लावल्याचे सांगत तेलतुंबडेने न्यायालायत धाव घेतली होती. तर तेलतुंबडेंविरोधात अनेक पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. मात्र, न्यायालायने तेलतुंबडेंची याचिका फेटाळली असली तरी त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांना ४ आठवड्यांची वाट पहावी लागणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121