अयोध्या मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही

    25-Sep-2018
Total Views | 29



सय्यद वसिम रिझवी यांचा मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांवर वार


लखनौ : भारतातील मूलतत्त्ववादी मुस्लिम पाकिस्तानी झेंड्याला इस्लामचा झेंडा समजतात आणि पाकिस्तानवर प्रेम करण्याला आपले इमान मानतात. अशा मानसिकतेचे लोकच अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर हक्क सांगत आहेत. अयोध्या प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान आहे, मुस्लिमांच्या तीन खलिफांचे कब्रस्तान नाही, अशा शब्दांत शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसिम रिझवी यांनी देशातील मूलतत्त्ववाद्यांवर दुगाण्या झाडल्या.

 

काँग्रेसशी हातमिळवणी करत वहाबी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाकिस्तानकडून पैसे घेतले आणि अयोध्या प्रकरण चिघळवले, असा आरोप करत रिझवी म्हणाले की, भारतात श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादात जे मृत्यू झाले त्यातल्या बळींच्या संख्येप्रमाणे इथले मुस्लिम मूलतत्त्ववादी पाकिस्तानकडे बक्षिसी मागतात. अयोध्येत प्रभू श्रीरामाचेच मंदिर उभारले पाहिजे आणि त्यासंदर्भाथला निर्णय लवकरात लवकर व्हायला हवा. श्रीराम भक्तच नव्हे तर खुद्द प्रभू श्रीरामही या संपूर्ण वादामुळे हताश झाले असल्याचे मला वाटते, असेही रिझवी म्हणाले.

 

अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीला गेले असून ही जमीन नेमकी कोणाच्या मालकीची आहे, यावरील निर्णय अजूनही बाकी आहे.

 

स्वप्नात तंबूतले रामलल्ला रडताना दिसले

 

अयोध्येत आपल्या जन्मस्थानी अजूनही मंदिराची उभारणी केली नसल्याने स्वप्नात आलेले तंबूतले रामलल्ला रडत होते. सोमवारी रात्री मला पडलेल्या स्वप्नात प्रत्यक्षात प्रभू श्रीराम आले. त्यावेळी ते दुःखी झाल्याचे आणि रडत असल्याचे दिसले.

 

- सय्य्द वसिम रिझवी

अध्यक्ष, शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121