अमेरिकेच्या 'त्या' पावलाचे भारताकडून स्वागत

    02-Aug-2018
Total Views | 9


नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंबंधीच्या अमेरिकेच्या निर्णयाचे भारत सरकारकडून स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेने घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य असून यामुळे भारत आणि अमेरिका यांच्या दहशतवादीविरोधी भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

'अमेरिकेने उचलले पाऊल हे अत्यंत स्तुत्य असे असून यामुळे भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अधिक बळ मिळाली आहे, असे मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. तसेच अमेरिकेने हे पाऊल उचलल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या मंगळवारी अमेरिकेने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल रेहमान अल-दाखिल याच्यासह अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. १९९४ ते २००२ दरम्यान भारतात आणि विशेषतः काश्मिरात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये अब्दुलचा हात असल्याचे पुरावे अमेरिकेला मिळाले होते. त्यानुसार अमेरिकेने यावर कारवाई करत अब्दुल आणि अन्य दोघाजणांना जागतिक दहशतवाद्यांच्या यादीमध्ये सामील केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

काँग्रेस संबंधित कंपन्यांवर ईडीची टांगती तलवार, कार्यवाहीस लवकरच सुरूवात होणार

ED काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी संबंधित असणार्‍या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी कार्यवाहीस सुरूवात केली. या मालमत्तेत दिल्ली, मुंबई आणि लखनऊमधील प्रमुख असणाऱ्या मालमत्तांचा समावेश आहे. काँग्रेसच्या संबंधित असणाऱ्या कंपनीशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीकडे ६०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी देशाची राजधानी दिल्लीतून बहादूर शाह जाफर मार्गावरील प्रतिष्ठित हेराल्ड हाऊस आहे...

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजमेरमध्ये २३ वर्षांपूर्वी भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Bangladeshi राजस्थानातील अजमेर पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी घुसखोरी व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व्हिसाशिवाय अवैधपणे बांगलादेशी व्यक्तीने भारतात घुसखोरी केली आणि त्याला तब्बल २३ वर्षानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित अवैधपणे घुसखोरी करणाऱ्याचे नाव हे मोहम्मद शाहिद असून त्याचे वय वर्षे हे ४० आहे. तो अजमेरमधील अंदर कोट परिसरात अवैधपणे वास्तव्य करत होता. एटीएएफने एकूण अकरा कारवायांमध्ये एकूण २१ घुसखोरांना पकडले आहे. दरम्यान, आता दर्गा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121