चिखलोली धरणाचे पाणी पिण्यायोग्य

    06-Jul-2018
Total Views | 21



अंबरनाथ: चिखलोली धरणातील पाणी आता पिण्यायोग्य असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिला असल्याने या धरणातील पाणी लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, असे आदेश आ. डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्या.  डॉ. किणीकर, नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरपालिका पाणीपुरवठा समिती सभापती संदीप भराडे आदींनी चिखलोली धरण आणि शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेतील फुलेनगर, नारायण नगर येथील जलकुंभांना भेटी दिल्या.

 

अंबरनाथ शहराच्या शिवाजीनगर ,वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित झाल्याच्या घटनेमुळे नागरिकांना त्रास झाला होता, धरणातील पाणी प्रदूषित असल्याचा निष्कर्ष आला आणि नंतर या धरणातील पाणी पिण्यासाठी देऊ नये, असे सूचित करण्यात आले होते. जलसंपदामंत्री सदाभाऊ खोत यांनी अंबरनाथला भेट देऊन चिखलोली धरणाची पाहणी केली होती आणि पाणी प्रदूषित करणार्‍या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पाणी खात्याच्या अधिकार्‍यांना दिले होते. या धरणातील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यानंतर ३० जून रोजी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, ठाणे यांनी चिखलोली धरणातील पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे.

 

आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार चिखलोली धरणातील पाणी नागरिकांना त्वरित उपलब्ध करून द्यावे, असे आदेश डॉ. किणीकर यांनी पाणी खात्याच्या अधिकार्‍यांना दिले. बांधून पूर्ण झालेल्या जलकुंभांचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, अशी माहिती आ. डॉ. किणीकर यांनी दिली. माजी नगराध्यक्ष विजय पवार, नगरसेवक सुभाष साळुंके, निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, तसेच पाणी खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121