शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : तांडव

    24-Jul-2018   
Total Views | 39

 
 
एखाद्या व्यक्तिला जेव्हा चहुबाजूंनी समस्या घेरतात, त्यावेळी त्याने काय करावं? त्याने करावा तांडव. म्हणजे? या लघुपटावरुन तुम्हाला लक्षात येईल. ही था आहे एका हवालदाराची. हवालदार तांबे याच्या जीवनात खूपच समस्या आहेत. तो एका शिपायाची नोकरी करतो त्यामुळे खूप पगारही नाही, बायकोच्या खूपच अपेक्षा, मुलीच्या शाळेच्या फीची चिंता, भ्रष्टाचार न केल्याने साथीदारांकडून आलेली वागणूक आणि अखेर गणपती विसर्नाच्या अहोरात्रीची कामाची 'ड्यूटी' एकूण कुठूनच समाधान नाही. अशा वेळेला त्याने काय केलं असणार? उत्तर आहे - तांडव.
 
शंकराला तांडव केल्यानंतर ज्या शांततेचा अनुभव होतो, तीच शांतता कदाचित तांबेला मिळाली असणार. विसर्जनाच्या मिरवणूकीत एक रिक्शेवाला आणि मिरवणूकीत नाचणाऱ्या सामान्य माणसात भांडण होते, आणि ते सोडवण्यासाठी ते तांबेची मदत घेतात. मात्र आपल्या जीवनात आधीच त्रस्त झालेला हवालदार तांबे अधिकच चिडतो आणि आपली बंदूक बाहेर काढतो.. आणि मग? मग काय होतं? ते या लघुपटात बघा.
 
 
 
 
या लघुपटाचा शेवट खूप बोलका आहे. माणूस आनंदी तेव्हाच राहू शकतो जेव्हा तो आनंदी राहण्याचे ठरवतो. आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी त्याने कोलमडून न जाता आपल्या आतील शक्तीवर विश्वास ठेवत सदैव आनंदी राहूनच आपण आयुष्यातील समस्या सोडवू शकतो, असा एक अमूल्य संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.
 
या लघुपटातील तांडव म्हणजे नेमके काय? हे तर तुम्हाला हा लघुपट बघूनच कळेल. मी त्या बाबत जास्त सांगितले तर लघुपटाची मजाच निघून जाईल. त्यामुळे हा तांडव तुम्ही स्वत:च बघा. या लघुपटाची खासियत म्हणजे नेहमीप्रमाणे मनोज बाजपेयी याने या लघुपटात अप्रतिम काम केले आहे. कृति, आउच या प्रमाणे या लघुपटात देखील त्याने आपले काम चोख केले आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे देवाशीष माखिजा यांनी. यूट्यूबवर या लघुपटाला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.
विशेष टीप : लघुपटाच्या शेवटच्या दृष्यासाठी तरी हा लघुपट नक्कीच बघा.
- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

जनसुरक्षा कायद्याविरोधी अपप्रचाराचे षड्यंत्र उधळून लावण्याची गरज : सागर शिंदे

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरलेल्या शहरी माओवाद आणि नक्षली चळवळीविरोधात ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ प्रस्तावित आहे. यासंदर्भात आवश्यक त्या सूचना आणि प्रस्तावदेखील राज्य सरकारच्यावतीने सार्वजनिक स्वरूपात मागवण्यात आले असून, त्या सूचनांचाही कायद्याचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी विचार केला जाईल. परंतु, या कायद्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात संभ्रमनिर्मिती नक्षली संघटनांकडून सुरु आहे. त्यानिमित्ताने या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी आणि कायद्याविरोधातील अपप्रचाराचे षड्यंत्र, याविषयी ‘विवेक विचार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121