पालिका म्हणते 48 तासांमध्ये खड्डे बुजवा

    07-Jun-2018
Total Views | 25



मुंबई : पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पडणार्‍या खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पालिकेने २४ वॉर्डसाठी २४ क्रमांक, व्हॉट्स अ‍ॅप ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. पालिकेच्या क्षेत्रातील कोणत्याही विभागामध्ये खड्ड्यात पडल्याची तक्रार आल्यास ती १ ते ४८ तासांत सोडवली जाणार आहे. दरम्यान, पालिकेने सध्या ४८ तासामध्ये खड्डे बुजवणार असल्याचा दावा केला असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासन आश्‍वासन पाळण्यामध्ये कितपत यशस्वी ठरेल, हे स्पष्ट होणार आहे.

मुंबईतसह कोकण भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक-प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून, मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी भरपावसातही खड्डे बुजवण्याचे काम सुरू असणार आहे. यासाठी लागणारे कोल्डमिक्स पालिकेने स्वत: तयार केले असून, पावसाळ्यासाठी लागणारे अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४० टन कोल्डमिक्स तयार केले असून, प्रति २५ किलोप्रमाणे ७५० बॅग्स कोलमिक्स तयार ठेवले आहे. भरपावसात कोल्डमिक्सपासून बुजवलेले खड्डे शंभर टक्के मजबूत असून, मुंबईकरांना त्याचा फायदा होईल, अशी माहिती अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक विनोद चिठोरे यांनी दिली. प्रत्येक वॉर्डमध्ये तक्रारीसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, तातडीच्या कामांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्पेशल इंजिनिअर, ‘एमसीजीएम-२४ तास’ कार्यरत, रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक - 1800221293, प्रत्येक वॉर्डमध्ये फलक लावून, जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121