वीज खात्याच्या अनागोंदी कारभाराचा बदलापूरकरांना फटका

    11-Jun-2018
Total Views | 26



बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात महावितरणाच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. दुरुस्ती झाल्यानंतरही अवघ्या काही तासांतच पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याने बदलापूरकर संतप्त होत आहेत. रात्री-अपरात्री वीज गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महावितरणाचे करायचे काय?, असा संतापजपनक सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, वाढलेल्या लोकसंख्येला वीजपुरवठा करण्यात महावितरण विभाग कमी पडत असल्याचे सातत्याने समोर आले आहे. त्यातही उंच-सखल भागांत असलेल्या इमारती, जुने विद्युत खांब, रोहित्र, जुन्या झालेल्या वाहिन्या, खांबाशेजारी असलेल्या झाडांची न झालेली छटाई अशा असंख्य गोष्टींमुळे गेल्या काही वर्षांत तासंतास वीजपुरवठा खंडित झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींमुळे एका दिवसात अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचा जणू काही विक्रमच झाला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या पावसांच्या सरींमुळे तीन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावर नागरिक संतप्त झाले आहेत. वीजबिल भरण्यास एका दिवसाचा जरी विलंब झाला, तरी महावितरणचे कर्मचारी मीटर जोडणी तोडण्यासाठी घरोघरी पोहोचतात. मात्र तासंतास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याची जबाबदारी घेताना मात्र महावितरण दिसत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121