शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : Should Nirbhaya fight back ?

    24-Apr-2018   
Total Views | 37


 
काही दिवसांपासून लहान मुलींवर, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविषयी चर्चेला पुन्हा उधाण आलं. आजही लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नाही. निर्भयाची कथा आठवली की अंगावर अक्षरश: काटा येतो. आजचा लघुपट देखील याच विषयावर आहे. "बलात्काराहून मोठा गुन्हा दुसरा कुठलाही नाही, आणि हे दु:ख या यातना याहून भीषण दुसरे काहीच नाही" असे म्हणतात. मात्र अशा वेळी काय करावे? यावर भाष्य करणारा हा लघुपट.
एक मुलगी रात्री उशीर झाला असताना एका टॅक्सीतून घरी जायला निघते. आईला फोन करते की मोबाइलची बॅटरी कमी आहे. मी येतेच आहे घरी. थोड्यावेळाने तिच्या लक्षात येतं टॅक्सीवाला दुसऱ्या रस्त्याने नेतोय. ती त्याला प्रश्न विचारते, तो गर्दीचे कारण देवून शॉर्टकट ने नेत असल्याचे सांगतो. तिला भिती वाटायला लागते. ती त्याला मुख्य रस्त्यावर गाडी घ्यायला सांगते. तो ऐकत नाही, आणि यावरूनच तिला त्याचा हेतू लक्षात येतो. तो एका सूनसान ठिकाणी गाडी थांबवतो आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग.....

 
 
 
 
पुढे काय होतं? तिच्यावर अतिप्रसंग ओढावतो? का ती त्याला चोख प्रत्यूत्तर देवून स्वत:ला वाचवते? स्वत:ची रक्षा करते? जाणून घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा. खरं तर या लघुपटातून आताच्या मुलींना खूप काही शिकायला मिळतं. प्रसंग ओढावल्यास त्याला कसं सामोरं जायचं. त्यासाठी काय तयारी असली पाहिजे. आजच्या काळात काय आवश्यक आहे? हे सर्वच या लघुपटातून सांगण्यात आलं आहे. खलील हेरेकर यांनी दिग्दर्शित केलल्या या लघुपटात शिवानी सुर्वे आणि संग्राम साळवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाला यूट्यूबवर ६ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. 

आजच्या काळात मुलींना महिलांना स्वत:चे रक्षण करायचे असेल, तर त्यांना स्वत:ला मनाने आणि शरीराने मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्या खंबीर राहिल्यात तर त्या कुठल्याही प्रसंगाला धैर्याने आणि शौर्याने तोंड देवू शकतील.

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121