‘मन की बात’ या तुमच्याच भावना : पंतप्रधान

    25-Nov-2018
Total Views | 23
 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून मन की बात या कार्यक्रमाचे एकूण ५० भाग पूर्ण झाल्याबद्दल रविवारी नरेंद्र मोदींनी देशवासीयांचे अभिनंदन केले. यावेळी भावोद्गार काढताना, मन की बात'मध्ये आवाज फक्त माझा आहे. भावना माझ्या देशवासीयाच्या आहेत.”, असे ते म्हणाले.

 

दिनांक २५ नोव्हेंबरच्या ५०व्या भागात पंतप्रधान मोदींनी संविधान दिवस, गुरुनानक जयंतीशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, दिनांक ऑक्टोबर २०१४ रोजी 'मन की बात' कार्यक्रम सुरू झाला. ५० भागांपर्यंतचा प्रवास हा आपण सर्वांनी मिळून पूर्ण केला आहे. आकाशवाणीनेही या कार्यक्रमाचे सर्वेक्षण केले आहे. जवळपास ७० टक्के लोक नियमितपणे 'मन की बात' कार्यक्रम ऐकत आहेत. या कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मकपणा आला आहे. अनेकांनी आपले अनुभव सांगितले आहेत. 'मन की बात' कार्यक्रमामुळे रेडिओ हे माध्यमही लोकप्रिय होत आहे. याचा मला आनंद आहे, अशी भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

विविध प्रादेशिक भाषेत 'मन की बात' कार्यक्रम प्रसारीत करणाऱ्या आकाशवाणीतील कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. काही कर्मचारी प्रादेशिक भाषेत माझ्या आवाजात 'मन की बात' सादर करतात. तेव्हा ३० मिनिटांसाठी ते स्वत: मोदी झालेले असतात. मी या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे मोदींनी सांगितले.

 

संविधान सभेबद्दल आदर
 

'संविधान दिवस' दिवसाचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी यांनी संविधान सभेबद्दल आदर व्यक्त केला. संविधान सभेत देशातील महान व्यक्तीमत्त्वांचा समावेश होता. तीन वर्षात संविधान सभेने व्यापक, विस्तृत संविधानाची निर्मिती केली. संविधानात अधिकार आणि कर्तव्य यांच्याबाबत अधिक सविस्तरपणे असून अधिक स्पष्टपणे नमूद केल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121