बापरे! भारतात आला पाच कॅमेरे असलेला फोन

    22-Nov-2018
Total Views | 16



मुंबई : सॅमसंगचा Galaxy A9 हा फोन भारतात दाखल झाला आहे. या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये चक्क पाच कॅमेरे असणार आहेत. या फोनच्या मागील बाजूस चार तर एक सेल्फी कॅमेरा असणार आहे. भारतात बुधवारी (२१ नोव्हेंबर) Galaxy A9 हा फोन सादर करण्यात आला. पाच कॅमेरा असणारा हा जगातील पहिला फोन ठरला आहे. भारतीय बाजारात या फोनची किंमत ३६,९९० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

सॅमसंगच्या या नवीन फोनमध्ये भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव-नवीन फिचर देण्यात आले आहेत. मात्र या फोनच मुख्य आकर्षण फोनमध्ये असलेले पाच कॅमेरेच आहेत. या फोनच्या पाचही कॅमेरामध्ये इंटिलेजीयंट कॅमेरा हे नवीन फिचर देण्यात आले आहे. यामुळे अतिशय उच्च दर्जाचे फोटो काढता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

 

या फोनमधील मुख्य कॅमेरा २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/१.७ अपर्चरचा समावेश आहे. तर दुसरा कॅमेरा १०, तिसरा ८ व डेप्थ सेन्स कॅमेरा हा ५ मेगापिक्सल क्षमतेचा आहे. या शिवाय कंपनीने २४ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. दरम्यान, ६ व ८ जीबी रॅम असलेले दोन मॉडेल बाजार आणले असून याची किंमत अनुक्रमे ३६,९९० आणि ३९,९९० रूपये एवढी ठेवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

'या'देशातील मुस्लिमांना हजयात्रा करता येणार नाही, भारतासोबत १४ देशातील नागरिकांच्या व्हिसांवर बंदी

Hajj जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही...

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

कंपनीतील कर्मचार्‍यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला, जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडलं; काय आहे केरळच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121