धोका ग्लोबल वार्मिंगचा...

    08-Oct-2018   
Total Views | 67


 


उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. या ग्लोबल वॉर्मिंगला सर्वात जास्त जबाबदार अमेरिका, चीन, युरोपियन देश आणि अर्थातच आपला भारत देश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मानवाने केलेल्या डोळेझाकीचा परिणाम या आयपीसीसीच्या अहवालातून दिसून येत आहे.

 

वर्तमानपत्र उघडलं की दररोज आपल्याला 'ग्लोबल वॉर्मिंग'विषयी काहीना काही वाचायला भेटतं. मात्र बातम्या वाचून आपण त्याकडे दुर्लक्षच करत असतो. आपल्या या दुर्लक्ष करण्याने पृथ्वीचा नायनाट होत चालला आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना आपल्याला ते जाणून घ्यायचं नसतं. हाच माणूस दिवसेंदिवस औद्योगिक प्रगती करतोय. मात्र याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो हा विचार तो कधी करत नाही. मानवाच्या याच डोळेझाक वृत्तीमुळे जागतिक तापमान वाढ हा जगभरात सतावणारी आणि मानवनिर्मित समस्या निर्माण झाली आहे. गेल्या १४७ वर्षांपासून या समस्येला तोंड द्यावे लागत असून याची दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेली आपल्याला दिसत आहे. याचाच परिणाम इंटरगर्व्हनमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) नुकत्याच सादर केलेल्या आवाहलात दिसून आला आहे. या अवहलात जागतिक तापमानवाढीचा अर्थातच ग्लोबल वॉर्मिंगचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील १२ वर्षात जगभरातील तापमान एक ते दिड अंश सेल्सियन्सने वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वैश्विक तापमान वाढीमुळे गरम हवांच्या लाटा निर्माण होऊन उष्माघाताची लाट जगभरात पसरणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीय उपखंडावर होणार असल्याचे देखील या आवाहलात म्हटले आहे. त्यामुळे आपण केलेली डोळेझाक आपल्याच मरणाला आमंत्रण ठरल्याचे या अवहलातून दिसत आहे.

 

इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसी ही जागतिक स्तरावरची हवामान बदलविषयीची प्रमूख संघटना आहे. ही संघटना संशोधन करून हवामान बदल, हवामान बदलाचे परिणाम, भविष्यातील धोके आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी काम करते. त्याच्या आधारावर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलया विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेतले जातात. यापूर्वी देखील या संघटनेने जगभरात ग्लोबल वॉर्मिंग विषयी अलर्ट जारी केले होते. असाच अहवाल आयपीसीसीने काल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार २०३० ते २०५२ दरम्यान पृथ्वीवरील तापमानात १.५ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे, तसेच या तापमानवाढीमुळे काही भागात उष्माघाताची लाट येऊ शकते. काही भागात दुष्काळाची झळ बसू शकते. तर काही भागात महापूर येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालात भारतीय उपखंडावर सर्वात जास्त परिणाम होणार असल्याचे नमूद केले असून लाखो लोकांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. भारतीय उपखंडात प्रामुख्याने भारताच्या कोलकाता भागात व पाकिस्तानच्या कराचीमध्ये याचा सर्वात जास्त फटका बसणार असल्याचे म्हटले आहे. आयपीसीसीने प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये ६ हजार शास्त्रोक्त संदर्भ, ४२ हजार तज्ज्ञांनी नोंदविलेली माहिती आणि सरकारच्या प्रतिक्रियाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे ४० देशांतील ९१ लेखकांनी हा अहवाल संपादित केला आहे.

 

आयपीसीसीच्या अहवालानुसार या तापमान वाढीमुळे काही भागात नद्या आटून याचा अन्नधानांच्या उत्पादनावर परिणाम होईल. अगोदरच पाण्याची भीषण टंचाई असताना अजून त्यात भरेल तर महागाई देखील भरमसाठ वाढेल असे भाकीत केले गेले आहे. महागाई आणि अन्नधान्यची टंचाई वाढली तरी मात्र उत्पन्न आहे तसेच राहणार आहे. या सर्वांमुळे भारतात गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून लोकं भुकेने आणि उष्माघाताने मरतील, असा अंदाज या संशोधनात वर्तवण्यात आला आहे. बेसुमार जंगलतोड, हरित वायूचे उत्सर्जन, वाहनांची वाढती संख्या, यामुळे गेल्या काही वर्षात पर्यावरणात अत्यंत घातक बदल होत आहेत. याचाच परिणाम आपल्याला बदलत्या हवामानाच्या रूपातून दिसून येत आहे. उन्हाळ्यात पाऊस पडणे, हिवाळ्यात चटके लागणारे ऊन पडणे, चक्रीवादळ, त्सुनामी आणि अनियमित पावसाळा हीच ती लक्षणे आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. या ग्लोबल वॉर्मिंगला सर्वात जास्त जबाबदार अमेरिका, चीन, युरोपियन देश आणि अर्थातच आपला भारत देश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मानवाने केलेल्या डोळेझाकीचा परिणाम या आयपीसीसीच्या अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे आता गरज निर्माण झाली आहे ती डोळे उघडे ठेऊन पर्यावरण संवर्धन कमी करण्याची आणि जास्तीत जास्त झाडे लावून तापमान नियंत्रित ठेवण्याची.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

विजय डोळे

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब सब एडिटर म्हणून कार्यरत, ३ वर्षांपासून मेन स्ट्रीम मीडिया व डिजिटल मीडियामध्ये कामाचा अनुभव असून पुणे विद्यापीठामधून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. अनेक लघुपटांसाठी, विविध वेबसाईटसाठी लेखन, डिजिटल मीडिया तसेच शॉर्ट फिल्म प्रॉडक्शन आदी कामाचा अनुभव...

अग्रलेख
जरुर वाचा
Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

Ind vs Pak युद्धात अमेरिकेची एन्ट्री! ट्रम्प यांनी पाक सरकारला सुनावले

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर देण्यास बुधवार, दि. ७ मे रोजी सुरुवात केली. त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. अशातच आता सीमावर्तीभागात भारतीय लष्कराच्या जोरदार हालचाली होताना दिसतायत. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु भारताची अत्याधुनिक यंत्रणा पाकिस्तानचा प्रयत्न अयशस्वी करत आहेत. अशातच भारत-पाकिस्तान युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तानला तात्काळ मागे हटण्याचे आणि भारतासोबतचा तणाव त्वरित कमी करण्याचे आदेश अमेरिक..

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

Operation Sindoor LIVE updates : पाकिस्तानकडून हल्ल्यासाठी हमाससारख्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न!

पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121