मुंबई महानगरात पुनर्विकासातून गृहक्रांती
मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून, ती लाखो कष्टकऱ्यांचे हक्काचे घर. मात्र, गेल्या अनेक दशकांत जीर्ण इमारती, रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि अनिश्चिततेत जगणारे रहिवासी ही मुंबईची वेदनादायी बाजूच चर्चेत राहिली. ही स्थिती बदलण्यासाठी राज्य सरकारने नागरिककेंद्रित गृहनीती स्वीकारत पुनर्विकासाला गती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, सरकारी यंत्रणा, ‘म्हाडा’ आणि रहिवासी यांच्यातील समन्वयातून मुंबईत आज खऱ्या अर्थाने गृहक्रांती आकार





