Pakistan economic crisis दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या पाकचे आर्थिक कंबरडेच भारताने मोडले असून, सिंधू जलवाटप करार रद्द केला आहे. यातून काय साध्य होणार, असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना या नद्यांचे पाकसाठी असणारे महत्त्व समजून घ्यावे लागणार आहे. एकाचवेळी पाकी अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, ऊर्जानिर्मिती, अन्नसुरक्षा यांच्यावर कठोर प्रहार भारताने केला आहे.
Read More
(Mumbai Water Shortage Crisis) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातच तापमानवाढीमुळे बाष्पीभवन होऊन धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट तयार झाले आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने तत्पूर्वीच राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून काँग्रेससह विरोधकांनी टीकेची झोड उठविली. ‘लाडकी बहीण योजने’मुळे सरकारने विकासकामांना कात्री लावल्याचाही आरोप करण्यात आला. पण, नुकत्याच सादर झालेल्या काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमधील सुक्खू सरकारच्या अर्थसंकल्पाने तर तेथील विकासालाच गोठवल्याचे दिसून आले. त्याचे कारण म्हणजे, सुक्खू सरकारच्या रेवड्यांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजाचा वाढता हिमालय! अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार, हिमाचल प्रदेशचे कर्ज १ लाख, ०४ हजार, ७२९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
पूर्वाश्रमीची इराणी नागरिक आणि आताची स्वीडनची नागरिक असलेल्या लीना इशाक या महिलेला स्वीडनमध्ये नुकतीच १२ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिने एका याझिदी महिलेला आणि तिच्या सहा मुलांना गुलाम बनवले होते. त्यांच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबूल करवून, ती सगळी कामे करून घेत होती. त्या सगळ्यांना तिने बंदी बनवले होते. भयंकर! ‘इसिस’मधल्या पुरुषांनी याझिदी समाजावर अत्यंत क्रूर, अमानवी अत्याचार केले, नरसंहार केला आणि ‘इसिस’मध्ये सामील असलेल्या महिला दहशतवादीही तशाच!
(NIA) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी आयसिसच्या कट्टरतावाद प्रकरणात तामिळनाडूमधील १६ ठिकाणी छापे टाकले.
जागतिक व्यासपीठांवर पर्यावरण रक्षणासाठी विविध करारांवर स्वाक्षर्या करून जबाबदारीचे प्रदर्शन करणार्या अमेरिकेने, स्वतःच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणावर फारसे लक्ष दिलेले नाही. कारण, जागतिक पातळीवर इतर देशांना पर्यावरण रक्षणाचा उपदेश करणारी ही महासत्ता स्वतः पर्यावरण रक्षणामध्ये सातत्याने अपयशी ठरली आहे.
ISIS राष्ट्रीय तपास यंत्रनेने अधिकृत निर्देशनानुसार तरुणांना भारतात हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारला आहे. हा निधी उभारण्यासाठी जागतिक दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत. हा आरोप मंगळवारी एका अधिकृत निवेदनासुसार दाखल करण्यात आले आहेत.
पैशापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे असल्याचे बाळकडू उमाकांत श्रीकृष्ण चौधरी ( Umakant Chaudhari ) यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते. जीवनात अनेक चढउतार आले असतानाही त्यांनी पैशापेक्षा माणुसकी जपत संकटांना तोंड दिले. अशा परिस्थितीत ही त्यांनी चेहर्यावरील हसू कधी ढळू दिले नाही. त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...
पाकिस्तानमध्ये सुन्नी विरुद्ध शिया आणि दोन्ही मिळून अहमदिया विरुद्ध असे गृहयुद्ध सुरू आहे. कालपरवा तर अहमदिया दुश्मनीवरून हजारो सुन्नी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयावर चाल करून गेले. ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’ समवेत विविध धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘मजलिस-ए-तहफ्फुज-ए-खतमे नबुव्वते’च्या बॅनरखाली आंदोलन केले.
बांगलादेशात हिंदूंवर जो रक्तरंजित अत्याचार झाला, त्याची अखेरीस दखल संयुक्त राष्ट्रसंघाला घ्यावीच लागली. आपल्या ताज्या अहवालात तेथे 650 जणांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राने मान्य केले आहे. त्याचवेळी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षाही जास्त असू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. बांगलादेशातील परिस्थिती जेव्हा चिघळली, तेव्हाच त्वरेने संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करत, त्यावर नियंत्रण मिळवले असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही संयुक्त राष्ट्राला उशिरा आलेली जागच!
इराणमधील मोठ्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पनेही आपल्या निवेदनात या वृत्तास दुजोरा दिला आहे.
केरळच्या डाव्या सरकारने पुन्हा एकदा केंद्र सरकारला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. काँग्रेस आणि डाव्या सरकारांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा फटका बसलेल्या केरळने केंद्राकडे २४,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मागितले आहे. केरळचे म्हणणे आहे की ते आपल्या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी या पॅकेजचा वापर करेल.
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी आयएसच्या बेल्लारी मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या सात दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) चे मॉड्यूल नष्ट करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या दहशतवाद्यांवर स्लीपर सेल म्हणून काम करण्यासाठी तरुणांना 'मुजाहिदीन' म्हणून भरती आणि कट्टरपंथी बनवल्याचा आरोप आहे.
" पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छ
२०१९ मध्ये, देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये थंडीचे वातावरण होते. जेव्हा जहाँजेब सामी आपली पत्नी हिना बशीर बेग हिच्यासह जम्मू काश्मीरमधून दिल्लीत स्थलांतरित झाला. मोदी सरकारने कलम ३७० कलम हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनेक फुटीरतावादी नेते नजरकैदेत असताना त्याच वर्षी दि. ६ ऑक्टोबर रोजी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. जहाँजेब सामी एका ब्रिटीश कंपनीत काम करत होता.
सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘इसिस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘इसिस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘इसिस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांस
कोरोना महामारी, उघूर मुस्लिमांचा नरसंहार, दक्षिण चीन समुद्रातील दंडेलशाही, छोट्या देशांभोवती कर्जाचा विळखा, अशा एक ना अनेक कारणासाठी चीन जगभरात बदनाम आहेच. पण, त्याच चीनने आता जागतिक पातळीवरील सर्वांत महत्त्वाची संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाला ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचल्याचे समोर आले आहे . ड्रॅगनच्या याच नापाक खेळीचे विश्लेषण करणारा हा लेख...
भारतीय तपास यंत्रणांना दहशतवादी कारवायांविरोधात मोठे यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्चीच तपास यंत्रणांनी इसिसचा भारतीय प्रमुख हरिस फारुकी उर्फ हरीश अजमल फारुकी याला अटक केली होती. यासोबतच आता तपास यंत्रणांनी आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी तौसिफ अली फारुकी याला इसिसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
रेड सी प्रकरणामुळे (Red See Crisis) मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयात निर्यातीवर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ( Crude) तेलाच्या पुरवठा कमी झाल्यानं किंमतीतही फरक पडला.याच धर्तीवर भारत सरकारच्या वाणिज्य विभागाचे नवीन आकडे समोर आले आहेत.
पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएमच्या गैर कार्यकारी अध्यक्ष व वन ९७ कम्युनिकेशन संचलित पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य म्हणून आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. पेटीएम प्रकरणानंतर अखेर त्यांनी हा राजीनामा देत असल्याचे रेग्युलेटरी फायलिंगमध्ये कंपनीकडून सांगण्यात आले.
एज्युकेशन टेक कंपनी बारजू'ज वरील संकटात वाढ होत असताना मोठी घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. बायजू'जच्या काही भागधारकांनी बायजू रविंद्रन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव सादर केला होता. सर्वसाधारण बैठकीत तातडीने हा प्रस्ताव मांडून बायजूज रविंद्रन यांच्यावर कंपनी चालवण्यासाठी अकार्यक्षम असल्याचा आरोप करत प्रस्ताव ठेवला. अंमलबजावणी संचनालयाकडूनदेखील देश न सोडण्याचा अटीवर त्याला लूक - आऊट नोटीस बजावण्यात आली होती. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ९३६२.६५ कोटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. मात्र रविंद्रन क
उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इसिस मॉड्युलप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. एटीएसने अमास उर्फ फराज अहमद आणि अब्दुल समद मलिक या दोघांना अटक केली आहे.
रेशन घोटाळा, चिटफंड घोटाळा आणि नगरपालिकांमधील नोकरी बदली घोटाळा यांमध्ये ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगाल सरकार आकंठ रूतले आहे. आपले पितळ उघडे पडताना दिसताच, ममता यांचे सहकारी अधिकारी आणि संस्थांवरही हल्ले करत आहेत. या हल्ल्यामंध्ये घुसखोर रोहिंग्या सामील आहेत, असे दिसते. त्यानिमित्ताने तृणमूल काँग्रेस आणि घुसखोर रोहिंग्यांच्या संबंधाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी (28 डिसेंबर 2023) दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मॉड्यूल प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. एनआयएने हे आरोपपत्र एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एके लाहोटी यांच्या न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत दाखल केले आहे.
पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्या शाहनवाज आलमचा, महाराष्ट्र ISIS मॉड्युल मास्टरमाइंड साकिब नाचन याच्याशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालातुन ही माहिती उघड करण्यात आली आहे. साकिबला एनआयएने ९ डिसेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, शाहनवाजच्या अटकेच्या काही महिन्यांपूर्वी साकिबचा मुलगा शमिल नाचन यालाही ऑगस्टमध्ये पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती.
राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला. कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा - बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडयूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने चार महिन्यांपुर्वी पडघ्यातून सहापैकी चार दहशतवाद्यांना इथूनच अटक केले होते. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया
एनआयएने शनिवारी कर्नाटकसह महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत शस्त्रास्त्र आणि इसिस संबंधी काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींनी भिवंडी तालूक्यातील पडघा हे गाव इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केल्याची माहिती पुढे येत आहे.
कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे.
घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचन याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. एनआयने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली. ही छापेमारी ४१ ठिकाणी करण्यात आली. यात १५ जणासह साकिबचाही समावेश होता.
इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकांनी शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर येथे छापे टाकण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिसच्या दोन एजंट्सला अटक केली आहे. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून निधी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रियाजुद्दीन आणि अमृतपाल सिंग उर्फ अमृत गिल अशी त्यांची नावे आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) इसिस या दहशतवादी संघटनेविरुद्ध कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. नोव्हेंबर महिन्यात एटीएसने इसिसच्या अनेक दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता इसिसचा स्वयंघोषित खलिफा असलेल्या वजिहुद्दीन याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोव्हेंबर महिन्यात अलिगड इसिस मॉड्यूलच्या सात दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांचा संबंध अलिगड मुस्लिम विद्यापीठाशी (एएमयू) आढळून आला आहे. त्यामुळे एएमयू दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादासंबंधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेच्या पुणे मॉड्यूलविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आरोपपत्र दाखल केले आहे. हे दहशतवादी भारतीय संविधानाला गैर इस्लामिक मानत असून ते गैर-मुस्लीम लोकांना मारण्याची योजना आखत असल्याचे या आरोपत्रात सांगण्यात आले आहे.
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या दोन दहशतवाद्यांना झारखंड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अरिज हसनैन आणि मोहम्मद नसीम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे आहेत. ते दोघेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
एका स्वीडिश अहवालानुसार, ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतून परत आलेल्या दहशतवाद्यांकडून स्वीडनला धोका निर्माण झाला आहे. या दहशतवादी संघटनेतून परत आलेले सदस्य सहजपणे रोजगार मिळवण्यात यशस्वी होत असून पुन्हा इराक, सीरियामध्ये जाताना आढळून आले आहेत. त्यातच इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे युरोप पेटले असून हा संघर्ष आणखीन उफाळण्याचीच शक्यता जास्त!
हिंदुत्वाच्या विचारापेक्षा समाजवादी विचार अधिक महत्वाचे असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी आता पॉप्युलर प्रिंट ऑफ इंडिया, आयसीस, रझा अकादमी आणि एमआयएमसोबतही युती करावी. असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, सामनाच्या अग्रलेखातून समृद्धी महामार्गावर केलेल्या टीकेला राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाच्या भाच्याला विचारावं, समृद्धी वरच्या फूड प्लाझाचं काम मलाच हवं, ब्लॅकमेलिंग कोण करत होतं? असा गंभीर आरोप य
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) इसिसशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी यास दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक केली आहे. शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात पमकुख आरोपी होता.
देशाची 'नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी' (NIA) भारताच्या दक्षिण भागात 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (ISIS) च्या प्रशिक्षण केंद्रांचा पर्दाफाश करण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत, NIA ने दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी तामिळनाडूमधील कोईम्बतूर, चेन्नई आणि तेलंगणासह सुमारे ६० संशयित ISIS केंद्रांवर छापे टाकण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रात सध्या दोन ठाकरे अर्थात राज आणि उद्धव ठाकरे असा कलगीतुरा रंगला आहे. त्यात आता भर पडली आहे, दोन पवारांची. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अनेक चढ-उतार पाहत स्थित्यंतरे अनुभवली. मात्र, त्यांना नाशिक महापालिका वगळता, अन्यत्र सत्तेची चव चाखता आली नाही.
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात दहशतवादी संघटनांनीही दहशतवादाच्या विषपेरणीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात केलेले दिसते. सोशल मीडियाचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर हा त्यापैकीच एक चिंताजनक प्रकार. अलीकडच्या दहशतवादविरोधी कारवायांतून यासंबंधीचे ठोस पुरावे समोेर आले आहेत. त्यानिमित्ताने कशाप्रकारे दहशतवादी कृत्यांसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो आणि नेटकर्यांनी यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला हवी, त्याचा आढावा घेणारा हा लेख...
इसिस प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पडघा येथील बोरिवली गावातील शमील नाचन याच्या घरात धाड टाकुन शोधमोहीम राबवली.यावेळी घरातुन दहशत माजवण्यासाठी लागणारी सामुग्री तसेच हार्डडिस्क,मोबाईल फोन आणि बॉम्ब बनविण्याबाबतची काही हस्तलिखिते जप्त करण्यात आली.
शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी एनआयएने आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. शमील साकिब नाचन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबवणे, हे खरं तर सुरक्षा यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान. दहशतवादी हल्ले काही वेळा विशिष्ट दिनाच्या निमित्तानेसुद्धा घडवले जातात. त्यातून दहशतवादी संघटनेला त्या राष्ट्राला पराभूत केल्याचा एक प्रतीकात्मक असुरी आनंद घ्यायचा असतो. पण, सजगता राखल्यास असे हल्ले टाळता येणे शक्य होते. साधी वाटणारी कर्तव्याची वाट जरी सामान्य नागरिकांनी प्रामाणिकपणे चालली, तरी उत्तम सुरक्षा राखली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा, आगामी १५ ऑगस्ट आणि त्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’चे समोर आलेले ‘पुणे
दहशतवादी कट कारस्थानात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या काही दिवसांत सहा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने ताब्यात घेतले आहे. हे दहशतवादी मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. वेळीच त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे घातपाताचा डाव उधळण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) गोरखपूर जिल्ह्यातून ISIS या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. दि. ६ जुलै रोजी या दहशतवाद्याला अटक केले असून मोहम्मद तारिक अथर असे त्यांचे नाव आहे. तो स्वत: कट्टरवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात एटीएसने यूपी पोलिसांना दहशतवाद्याला पकडण्यासाठी इनपुट दिले होते. चौकशीत तारिकने स्वतःला बगदादीपासून प्रभावित असल्याचे सांगितले आहे. त्याने इतर काही तरुणांनाही दहशतीचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला.
होय, पाकिस्तान अगदी आपल्या दाराशी आलेला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी भारतातीलच अनेकांना जाळ्यात ओढायला सुरुवात केली. नुकतीच ओडिशा पोलिसांच्या ’स्पेशल टास्क फोर्स’ने ‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा’ आणि ’पाकिस्तानी आर्मी इंटेलिजन्स’च्या संपर्कात असलेल्या काही तरुणांना अटक केली. पुण्यातील हिंजवडी परिसरात काम करणार्या एका तरुणाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांनादेखील ’हनी ट्रॅप’ करून ’पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणां’नी जाळ्यात ओढले होते.
नवी दिल्ली : गुजरातमधील पोरबंदरमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिस मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.