आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरर
Read More
मानवी जीवनामध्ये अहंकार ज्याला जडला, त्या अहंकाराने त्या मनुष्याच्या जीवनाचे वाटोळे केले हे निश्चित. अहंकार शत्रूच मुळात फसवा आहे. जोवर नुकसान होत नाही, तोवर या अहंकाराच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी या अहंकारापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला सज्जनांना देतात. अहंकार मानवी आयुष्यात कसे नुकसान करतो, याचे विवेचन...
दासबोध अभ्यासाची फलश्रुती कितीही चांगली असली तरी हा ग्रंथ ऐकणार्यांची, वाचणार्यांची जशी मनोवृत्ती असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होईल. स्वतःला विद्वान समजणारे काही टीकाकार हा ग्रंथ मुळातून न वाचताच त्यावर टीका करतात. त्यांना समर्थांचे सांगणे आहे की, जे मूळ ग्रंथ न वाचता केवळ मत्सर मनात ठेवून टीका करीत असतात, त्यांना मत्सराशिवाय दुसरे काय प्राप्त होणार? गुणांची पारख न करता ज्यांना फक्त दोषच पाहण्याची सवय असते, त्यांना तेच प्राप्त होणार यात संदेह नाही. जशी ज्याची वृत्ती तसे फळ त्याला मिळणार. अर्थात, हीसुद्धा
ब्रह्म समजणे हे फार कठीण आहे. तरी समर्थांनी शास्त्राधारे सूक्ष्म कालगणना, विष्णू, महादेव, आदिशक्तीचे कालखंड सांगून त्याच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माची माहिती दिली आहे. वस्तुतः या परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत, आमच्या देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण वाटून आत्म्याचे मोठेपण आम्हाला समजत नाही, देहबुद्धी नाहीशी करुन, कोणत्याही कारणाने न बदलणाऱ्या परब्रह्माचा विचार करु तेव्हाच ब्रह्मनिरुपण समजले.
अखेरीस शिवाजी महाराज माहुलीला आले असताना त्यांची एका समर्थशिष्याशी गाठ पडली आणि त्या शिष्याने रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांसाठी आणलेले एक पत्र त्यांना दिले. त्या पत्रातून समर्थांनी शिवाजी महाराजांचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्या पत्रानंतर आजतागायत सुमारे ३५० वर्षांमध्ये अनेक अभ्यासकांनी, प्रतिभावंतांनी, कवींनी, शाहिरांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे
आजच्या काळातील वैचारिक चश्म्यातून आपण सतराव्या शतकातील माणसांची मानसिकता अजमावू लागलो, तर अनर्थ ओढवेल, हे माहीत असूनही आजचे टीकाकार समर्थांवर अकारण टीका करताना दिसतात. आजचा वाचकवर्ग हा सूज्ञ आहे. त्यामुळे समर्थांवरील टीकेतील कालविपर्यास हे वाचक ओळखतात.
ज्याच्या ठिकाणी भ्रम नसतो, त्याला ‘महापुरुष’ म्हणून ओळखता येते, असे समर्थांचे मत आहे. ‘भ्रम नसेल तयासी। मनी ओळखावे तयासी। महापुरुष।’ या जगात दिसणारे त्रिगुण आणि पंचमहाभूते हे नाशवंत असल्याने सर्व भ्रमरूप आहेत. प्रापंचिक भ्रमाचे जे प्रकार समर्थांनी ‘भ्रम निरूपण’ या समासातून सांगितले आहेत, त्यापैकी काही भ्रमांचा विचार आपण मागील लेखात केला. आता आणखी भ्रमाचे प्रकार पुढे दिले आहेत.
आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पत्ती, स्थिती आणि संहार एवढीच विश्वाची ओळख असते. या जगातील दिसणारी, अनुभवाला येणारी प्रत्येक वस्तू विघटनशील असते हे आपण पाहिले. वस्तूचे विघटन होते म्हणजे ती नाश पावते, असे आपण समजतो. परंतु, परब्रह्म अविनाशी असते. ते पूर्वी होते, आता आहे आणि विश्वसंहारानंतरही तसेच राहणार आहे. त्यात काहीही बदल संभवत नाही.
स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतच्या यशस्वी प्रवासासाठी त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. विशेष लोकांना ज्ञात नसलेला लेखन प्रकार म्हणजे सवाया