(Maha Arogya Shibir) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांनी मुंबई येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासण्यांसोबतच औषधोपचार तसेच, रुग्णांना व्हील चेअर्स, वॉकर्स, चष्मे आणि इतर वैद्यकीय सामग्रीदेखील मोफत वाटण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात तब्बल दहा हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून, लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद या महाआरोग्य शिबिराला लाभला आहे.
Read More
(Ramdas Kadam) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 'न भूतो न भविष्यति' असे अभूतपूर्व यश मिळवून राज्याच्या सत्तेची सूत्रे आपल्याच हातात ठेवली आहेत. विधानसभेच्या पराभवानंतर आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शाब्दिक वार
(Ramdas Kadam) शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सहकुटुंब शिर्डीला साईदरबारी पोहोचत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी महायुतीच्या यशाबद्दल व एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीवर भाष्य केले.
(Aaditya Thackeray) शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा थेट उल्लेख करत आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी दापोलीतील सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असा थेट इशारा दिला आहे.
अनिल परब यांनी रडीचा डाव खेळू नये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. उबाठा गटाचे नेते आणि मुंबई पदवीधर निवडणूकीचे उमेदवार अनिल परब यांनी आम्ही नोंदवलेली अनेक नावे रद्द करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यावर आता दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याताच काही दिवसांपुर्वी उबाठा गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे बंधूना एकत्र येण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स मुंबई शहरात लावले होते. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार अशी राजकीय वर्तळात चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत, त्यांनी राजीनामानाट्यातून अजित पवारांना चपराक लगावत त्यांना उघडं पाडलं,” असे भाष्य रामदास कदम यांनी केले आहे.
अयोध्या : अयोध्येतील संत महातांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहाती प्रभू श्रीरामाचे आयुध असलेला धनुष्यबाण विधिवत सुपूर्त करून धर्माचे राज्य निर्माण करण्याचा आशीर्वाद देण्यात आला. लक्ष्मण किला येथे पार पडलेल्या दर्शन आणि महंत संकल्प महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते, मंत्री आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी अयोध्येतील महंतांचा यथोचित सन्मान करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शुभआशिर्वादही घेतले.
साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांची ईडी कोठडी आज संपली. यानंततर ईडीने वाढवून मागितलेला कोठडीची मागणी न्यायालयाने फेटळून लावली. यानंतर सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
"उद्धव ठाकरे यांनी आपला शिवसेना पक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधला, अशी टीका माजी आमदार आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात जामगे या गावातील आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांचे पुत्र योगेश कदम आमदार असताना अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी पुरवला, असा आरोपही त्यांनी केला.
Varun Sardesai यांची पत्रकार परिषद
"उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या बडव्यांनीच त्यातही मिलिंद नार्वेकरांनीच अर्धी शिवसेना संपवली, कशी संपवली हे उद्धव यांना कळले सुद्धा नाही" अशा शब्दांत आरोप करत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर निशाणा साधला आहे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष जोरात सुरु असताना शिंदेगटात सामील झालेले रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. रामदास कदम यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. "बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले.", असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या नेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेतून त्यांची अधिकृत हकालपट्टी झाली. शनिवारी दि. २३ जुलै रोजी खेड तालुक्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची महत्वाची बैठक भरणे नाका येथील हॉटेल बिसू या ठिकाणी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
"बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे मी लवकरच माध्यमांसमोर उघड करणार आहे. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली हेही स्पष्टपणे लवकरच सांगणार आहे. आदित्य यांचे जेवढे वय आहे, त्यापेक्षा आम्ही राजकारणात जास्त वर्ष घालवली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नाही.", अशी बोचरी टीका करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. शुक्रवारी (दि. २२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
पत्रकार परिषदेत ढसाढसा रडणाऱ्या माजी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी कदमांनी केलेल्या सर्वच आरोपांना प्रत्युत्तर देत घणाघात केल्याचे समजते आहे. रामदास कदमांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोपही ठाकरेंनी केला आहे. "त्यामुळे ाता तुम्ही रडण्याची ढोंगंसोंगं करू नका,", असेही ठाकरे म्हणाले. "शिवसैनिक तुम्हाला पुरते ओळखून आहे," असा पलटवारही त्यांनी केला आहे.
“गेल्या महिन्याभरात पक्षाची जी अवस्था झाली आहे, ती पाहवत नाही. तर जे ५० वर्षांमध्ये उभे केले, ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही,” असे भावनिक वक्तव्य पक्षाची झालेली अवस्था सांगताना रामदास कदम यांनी केले.
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर केले आरोप
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा कोकण दौरा सुरू आहे. पाटील दापोलीत येण्यापूर्वीच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोकणातील नेते रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजीनंतर आता त्याचे पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. रामदास कदम यांच्या विधान परिषद आमदारकीचा कालावधी लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना पुन्हा एकदा खेडच्या मतदार संघातून जागा मिळेल, अशी शाश्वती नाही.
दसरा मेळाव्यात भाजप विरोधाचे प्रवचन पक्षप्रमुख मुख्यमंत्र्यांनी झोडल्यानंतरही शिवसेनेत मात्र पक्षांतर्गत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पार पडणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना नेते रामदास कदम हजर राहणार नाहीत. रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपनंतर शिवसैनिकांमध्ये कदमाविरोधांत संतापाचे वातावरण आहे. मात्र, रामदास कदम यांनी एक पत्र लिहून प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आपण दसरा मेळाव्याला उपस्थित न राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याना दिली आहे.
वादग्रस्त क्लिप व्हायरल प्रकरणी बोलताना भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सवाल केला मग, मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांची माहिती कुणी दिली ? हे देखील विचारणार का ? .तसेच,ठाकरे सरकार आपले फोन टॅप करीत असल्याचे या व्हायरल क्लिपमुळे सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.रविवारी ठाण्यातील केबीपी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते. मविआ आघाडीतील शिवसेनेचे हेवीवेट मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांची माहिती शिवसेनेचेच माजी मंत्री रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्यामार्फत किरिट सोमय्या यांच्यापर्
ठाकरे सरकारला मुद्दाम अडचणीत आणण्याचा रामदास कदमांचा प्रयत्न?
रामदास कदम यांना मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे निलेश राणे यांनी केली त्यांच्यावर टीका
कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील या 'जादुई' राज्यकर्त्यांकडे आता शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना वेळीच आवरणे आवश्यक झाले आहे.
अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. तसेच अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.
राज्यात प्लास्टिक बंदीचे धोरण स्विकारले असल्यामुळे प्लास्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरात असलेले प्लास्टिक निरूपयोगी होणार
पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी परदेशात पलायन केलेला उद्योगपती नीरव मोदी याचा अनधिकृत बंगला तातडीने पाडण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिल्या.
खासदार संभाजी राजे यांचे सचिव योगेश केदार आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात फोनवर जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
गोरेगाव पूर्व आरे वसाहती नजीकच्या जंगलात सोमवारी सायंकाळी आग लागली. ही घटना घडल्यावर आता चौकशीची मागणी केली जात आहे.
तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मुंबईकरांना प्लास्टिक पिशव्या वेगळ्या ठेवायला सांगून, ही प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पालिका सोडवू शकली असती!
केवळ आपल्या शुभेच्छा आणि ‘करून दाखवलं’ या सदरातील विविध कार्यांची प्रसिद्धी करताना अनेकविध अडथळे आले असते, त्यामुळे कदाचित ‘आदित्य’ला ‘अर्घ्य’देताना ‘दासां’ना बॅनरवरील बंदीचा विसर पडला असावा...
शासनाने प्लास्टिक बंदीचा लोकाभिमुख निर्णय घेतला असून हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात सांगितले.
प्लास्टीक बंदी हवी हे अगदी खरं असलं तरी ज्यांना मुंबई बाहेरील जगचं ठाऊक नाही त्या युवराजांच्या सांगण्यावरून मंत्र्यांनी हा निर्णय घेणे नक्कीच व्यवहार्य नाही. कारण प्लास्टीकला अद्याप अन्य पर्याय उपलब्ध नाही, त्यातच कोणत्याही जनजागृतीशिवाय ही बंदी लादली गेली