सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
Read More
मुंबई : भारतातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये पहिल्यांदाच ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’त झोपडपट्टीचे सर्वेक्षण व नोंदणी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराचा उद्देश हा प्रकल्पाची अंमलबजावणी अचूक, पारदर्शक आणि कार्यक्षमपणे होणे यासाठी आहे. साधारणतः झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पांचे सर्वेक्षण ( Dharavi ) हे टोटल स्टेशन सर्व्हे आणि दस्तऐवजांची पडताळणी यांसारख्या पद्धतींवर अवलंबून होते.
(Wildlife Conservation) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात वन्यजीव आणि त्यासंबंधी काम करणार्या संवर्धकांना विशेष स्थान देण्यात आले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर असो, की वन्यजीव संवर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराचे नियोजन असो, वन्यजीवांसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश संकल्पपत्रात करण्यात आला आहे. वन्यजीव क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वन्यजीव संवर्धनामधील अनेक समस्यांवर तोडगा निघ
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
येत्या काळात ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी’ अन् ‘बायो टेक्नोलॉजी’ यांच्या संयोगामुळे फार मोठी उलथापालथ जागतिक स्तरावर अपेक्षित आहे. हे तंत्रज्ञान आतापर्यंत माणसाच्या बाह्यांगापर्यंतच मर्यादित होते.पण, आता या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्र संयोग झाल्यामुळे ते आपल्या शरीराच्या आतपर्यंत पोहोचले आहे. खोलपर्यंत शोध घेत ते जीवनाचा हिस्सा बनणार आहे.
मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील पहिल्या ‘स्मार्ट फेन्सिंग’ प्रणालीचे उद्घाटन केले. पाच किलोमीटरच्या या पथदर्शी प्रकल्पाच्या सफलतेनंतर भारत-पाकदरम्यान असलेली सीमा या प्रणालीने सुरक्षित करण्यात येणार आहे.