आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
Read More
समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की, हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येक
‘माझे-तुझे’ हा भेदभाव न करता वाद सोडून संवाद करावा, असे समर्थांचे मत आहे. बुद्धी ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. तिचा विवेकाने वापर करून आपली उन्नती साधावी, नाही तर बुद्धी, भक्ती यासारखी कामधेनू घरी असताना काही करंटे आनंद मिळविण्यासाठी वणवण फिरत राहतात व दुःख पदरात पाडून घेतात.
समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
समर्थ रामदासस्वामींवर प्रकाशित साहित्य एकाच ठिकाणी वाचणे शक्य व्हावे यासाठी सुमंगल प्रकाशनातर्फे 'समग्र समर्थ साहित्य' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहे.
समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’ समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
आज जर समर्थ रामदासस्वामी असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत आणि सर्वस्व होते. श्रीराम हा समर्थांचाही समर्थ, देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवणारा आणि स्वामींचा परमार्थ होता.
समर्थांच्या शिष्यांनी वेळोवेळी त्यांच्या लीला लिहून ठेवल्या होत्या. त्यांचा संदर्भ यात आहे. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, दिवाकर गोसावी या समर्थांच्या संगतीत वाढलेल्या प्रमुख शिष्यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रातील आठवणी, लीला आज उपलब्ध असत्या तर काय बहार झाली असती, असे पांगारकरांनी म्हटले आहे.
समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.
जुगार, चोरी, बाहेरख्यालीपणा, चहाडी, परस्त्रीगमन इ. वाईट सवयी असलेल्यांचे उल्लेख दासबोधात येतात. कृतघ्न, वाचाळ, भित्रे, निर्लज्ज, घाणेरडेपणाने राहणारे अशा लोकांचेही संदर्भ येतात. ही मूर्खांची लक्षणे आहेत.
समर्थ रामदासस्वामींनी पुष्कळ वाङ्मयनिर्मिती केली. त्याची थोडक्यात माहिती घ्यायची, तर सोळा स्फुट काव्ये त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ओवीसंख्या सुमारे तीन हजार २०० इतकी भरेल. त्याशिवाय वीस दशकी ‘दासबोधा’च्या सात हजार ७५१ ओव्या आहेत. मनाचे श्लोक २०५ आहेत. ‘आत्माराम’ ग्रंथाच्या १८३ ओव्या आहेत.