भारताविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या पाकिस्तानला घेतलं फैलावर, भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत केली पोलखोल

    29-Apr-2025   
Total Views | 9

India Slams Pakistan at UN
 
नवी दिल्ली : (India Slams Pakistan at UN) संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी व्हिक्टिम्स ऑफ टेररिजम असोसिएशन नेटवर्क अर्थात VOTAN या संयुक्त राष्ट्राच्या उपक्रमासंदर्भातील बैठकीत पाकिस्तानला चांगलं फैलावर घेतले. भारताविरुद्ध प्रचार आणि निराधार आरोप पसरवण्यासाठी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले.
 
काय म्हणाल्या योजना पटेल?
 
"दहशतवादी कृत्ये गुन्हेगारी आणि अन्याय्य आहेत, त्यांचा हेतू काहीही असो. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निःसंशयपणे निषेध केला पाहिजे. दहशतवादी कारवायांचे सूत्रधार, या कारवायांना आर्थिक मदत करणारे आणि अशा कारवायांचे कर्तेधर्ते यांना दोषी मानून त्यांना कठोर शासन व्हायला हवे. दहशतवादी कृत्ये ही गुन्हेगारी स्वरूपाची व असमर्थनीय असतात. मग त्यामागे त्यांचा उद्देश काहीही असो किंवा ती कधीही, कुठेही आणि कुणीही केलेली असोत", असंही योजना पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी
 
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा देणाऱ्या जगभरातल्या देशांचे यावेळी योजना पटेल यांनी आभार मानले. "आंतरराष्ट्रीय समुदायाची दहशतवादासंदर्भातली कठोर भूमिका यातून स्पष्ट झाली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर सर्वाधिक संख्येनं सामान्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा कारवायांनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर व समाजावर होणाऱ्या दूरगामी परिणामांची भारताला पूर्ण कल्पना आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल", असंही योजना पटेल यांनी नमूद केले.
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा
ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ॲग्रीस्टॅक योजनेत 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना जलद व परिणामकारकरित्या पोहचाव्यात यासाठी ॲग्रीस्टॅक ही केंद्र शासनाची योजना राज्यात आपण प्राधान्याने हाती घेतली. यात डिजीटल सेवांचा अंतर्भाव असल्याने शेतकऱ्यांना तेवढ्याच पारदर्शकपणे योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताची असलेल्या या योजनेंतर्गत येत्या 31 मेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी संबंधित यंत्रणेने पूर्ण करावी. या कामात टाळाटाळ करणाऱ्या संबंधित तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीयस्तरावरील जबाबदार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121