कोलकाता : (Murshidabad Violence) वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. याबाबतच प्राथमिक चौकशी अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असून त्यांना स्थानिक नेत्यांची मदत मिळाल्याचे समोर आले आहे. पुढे हेच घुसखोर नियंत्रणाबाहेर गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली.
वक्फ कायद्यावरील निदर्शनांमध्ये मुर्शिदाबाद जिल्हा आणि दक्षिण २४ परगणा येथे अशांतता पसरली होती, त्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बांगलादेशी घुसखोरांवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले, असेही तपासात आढळून आले. हिंसाचाराच्या दरम्यान, बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी तृणमूल सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही हस्तक्षेप करत संवेदनशील भागात केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुर्शिदाबाद आणि इतर भागात हिंसाचार पसरल्यानंतर, गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालमध्ये बीएसएफ आणि सीआरपीएफ सारख्या केंद्रीय निमलष्करी दलांना तैनात केले. हिंसाचारग्रस्त भागात बीएसएफच्या नऊ पथके आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) सहा पथके तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी बंगालचे गृह सचिव आणि डीजीपी यांना फोन करून परिस्थिती सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\