मेट्रो १४च्या पर्यावरण प्रभाव अभ्यासासाठी एमएमआरडीए नेमणार सल्लागार

९ महिन्यांत पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करणे बंधनकारक

    22-Mar-2025
Total Views | 5

metro 14


मुंबई, दि.२२: विशेष प्रतिनिधी 
कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ची कामे हाती घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने हालचाली सुरू केल्या आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएकडून लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबईची थेट बदलापूरला जोडणी देण्यासाठी मेट्रो १४ मार्गिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही मेट्रो मार्गिका ३८ किमी लांबीची असून या मार्गावर एकूण १५ स्थानके असतील. ही मार्गिका कांजूरमार्ग येथून सुरू होईल. घणसोली येथे ही मार्गिका भुमिगत असेल. जवळपास ५.७ किमी मार्गिका ही ठाणे खाडीखालून जाणारी असेल. घणसोली ते बदलापुर हा मार्ग उन्नत असेल. या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग हा पारसिक हिल भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आलेला आहे. हा डीपीआर आयआयटी मुंबईकडून तपासून घेऊन एमएमआरडीएने अंतिम केला आहे. येत्या काही महिन्यात हा डीपीआर मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याची तयारी एमएमआरडीएने पूर्ण केली आहे. राज्य सरकारकडून मंजूरी मिळताच या प्रकल्पाचे काम सुरु केले जाणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून मंजूरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रकल्पासाठी पर्यावरण मंजूरी घेण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे. ही मेट्रो मार्गिका ठाणे खाडी आणि पारसिक हिल या संवेदनशील भागातून जाणार आहे. तसेच फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून ही मार्गिका जाणार आहे. त्यामुळे सल्लागाराला ९ महिन्यामध्ये पर्यावरण प्रभाव अहवाल (ईआयए) तयार करावा लागेल. तसेच कांदळवन जंगल, फ्लेमिंगो अभयारण्य आणि वनविभागाच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

Ram Katha भारत सरकारने 1972 साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलेले, हिंदी भाषेचे विद्वान आणि राम, रामायण व समग्र विश्वातील रामकथेचे ख्यातनाम मर्मज्ञ-संशोधक डॉ. कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उगम आणि विकास’ हा हिंदी भाषेत लिहिलेला शोधप्रबंध जगातील सर्वच विद्यापीठांनी गौरवलेला आहे. रामकथेचा विश्वविख्यात विदेशी अध्ययनकर्ता संशोधक म्हणून डॉ. कामिल बुल्के ओळखले जातात. एक विदेशी गोरा माणूस ‘ईसाई मिशनरी’ म्हणून भारतात येतो काय आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून रामकथेचा मर्मज्ञ होतो काय, “रामकथेचा अभ्याच हीच माझी साधना,..

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

‘ Merchant Navy’ अर्थात व्यापारी जहाजांचे सध्याच्या काळात असलेले महत्त्व हे वादातीत आहे. अनेक देशातील खलाशी या क्षेत्रामध्येच यशस्वी करिअर घडवितात. देशालादेखील यातून लाभच होत असतो. मात्र, या खलाशांच्या जीवनावर मात्र कायमच धोक्याचे सावट असते. त्यात अनेकदा अडचणीमध्ये सापडल्यावर कंपन्यादेखील या खलाशांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. आजकाल या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्यामुळे खलाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्याच्या पालनाची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर ..