बंगळुरू : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राण्या रावला (Ranya Rao) सोन्याच्या तस्करी प्रकरणात जबाबदार धरण्यात आले आहे. या घटनेने कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. वाढत्या दबावाखीलल राज्याच्या सरकारने सोमवारी सायंकाळी हे प्रकरण सीआयडी विभागाकडे दाखल केले. एका दिवसानंतर, गृह विभागाकडे बंगळुरूमधील केम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस अधिकाऱ्यांच्या संभाव्य चुका आणि कर्तव्यावर निष्कळजीपणाकडे बोट दाखवत भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
डीआरआयच्या चौकशीदरम्यान, राज्यचे अधिकारी बसवराज इब्बलूर यांनी सांगितले की, राण्याला तिच्या वडिलांनी वकिलही दिला होता. त्यांचे वडील डीजीपी रामचंद्र यांच्या विनंतीवरून प्रोटोकॉल सुविधा देण्यात आल्या. बसवराज यांनी सध्याच्या प्रकरणात लक्ष घालत रामचंद्र राव यांच्या सहभागावर भाष्य करण्यात आले.
त्यांनी सांगितले की, रामचंद्र राव यांनी त्यांना फोन करत विमानतळावरून राण्याला बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न केला. राण्याला बसवराजशी फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. चौकशीदरम्यान, रामचंद्रराव यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे राव यांच्याविरूद्ध चौकशी करण्यात आली. आता ते राव यांना नोटीस बजावू शकतात असा संशय व्यक्त करण्यात येत आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरची परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
या प्रकरणाचे वाढते गांभीर्य पाहता कर्नाटक सरकारला १० मार्च रोजी साआयडीने चौकशीचे आदेश दिले. गृह विभागाने ११ मार्च रोजी हा आदेश मागे घेतला. यानंतर राज्य सरकारच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. बराच गोंधळ झाल्यानंतर, राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घातले.
अशातच आता गृह विभागाने नोटीसीत म्हटले की, प्रकरणाची चौकशी आयएएस गौरव गुप्ता करत आहे. त्यामुळे सीआ.जी चौकशी केली जाणार नाही. मात्र यातील कारण अनेकांना समजले नाही. कारण आयएएस गुप्ता यांच्या चौकशीच्या केंद्रस्थानी रामदास राव यांची भूमिका आहे.
या प्रकरणात आता भाजपने काँग्रेसला धारेवर धरले आहे. डीआरआयने केलेल्या चौकशीत राण्या रावने अनेक खुलासे केले आहेत. राण्या रावने सांगितले की, दुबई विमानतळावर एका अज्ञान इसमाने तिला सोने दिले आणि तो तिथून निघून गेला. तिने ते सोने शरीराच्या विविध भागांवर चिकटवले. एका टॉयलेट पेपरवर ते सोने झाकून ठेवण्यात आले होते. चौकशीदरम्यान असे सांगण्यात आले की, राण्या रावने तिच्या बुटांमध्ये आणि जीन्समध्ये एकूण १४ किलोहून सोने होते त्याची किंमत ही १२ कोटी रूपये इतकी होती. राण्या रावला त्यावेळी बंगळुरूमधून अटक करण्यात आली. त्याच्याकडे सोने सापडल्यानंतर, या प्रकरणाची सतत चौकशी सुरू आहे.