JNU विद्यापीठाचे प्राध्यापक राजीव सिजारिया लाचखोरी प्रकरणात निलंबित

१.८ कोटी रुपयांची लाचखोरी केल्याने गुन्हा दाखल

    04-Feb-2025
Total Views | 37
 
JNU
 
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) प्राध्यापक राजीव सिजारिया यांना लाचखोरी प्रकरणामध्ये निलंबित केले आहे. त्यांनी १.८ कोटी रुपयांची लाचखोरी केल्याची माहिती समोर आली आहे. सिजारीया हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक असून त्यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आता अटकही करण्यात आली आहे.
 
राजीव सिजारिया हा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अहवालाशी संबंधित प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नॅकचा अहवाल तयार करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
 
एका वृत्तानुसार, सिजारिया यांच्या निलंबनाच्या आदेशात असे लिहिण्यात आले आहे की, केएलईएफला अनुकूल A++ मान्यता मिळवून देण्याबाबत लाचखोरीचा आरोप करत भ्रष्टाचार प्रकरणात राजीव सिजारिया यांचा प्रथम सहभाग असल्याचे दृष्टीस आले. त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला. अधोरेखित केलेल्या व्यक्तीने सीबीआय चौकशी आणि संबंधित प्रकरणावर विभागीय चौकशीबाबत निकाल समोर येईपर्यंत सिजारियांना विद्यापीठाच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबन करण्याचा आदेश हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी केला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

स्वपक्षातील नेत्याच्या मुलाने तयार केलेलं चिन्ह हटवलं, हिंदीविरोधाच्य़ा नादात मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पडला विसर! भाजप अध्यक्षांनी करुन दिली आठवण, म्हणाले...

(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे...