साहित्य अकादमीने ‘युवा पुरस्कार २०२५’ साठी २४ भारतीय भाषांमधील लेखकांना व प्रकाशकांना त्यांची पुस्तके पाठवण्याचे आवाहन केले आहे. पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचे वय १ जानेवारी २०२५ पर्यंत ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. या पुरस्कारसाठी पुस्तके पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. पुस्तकांसोबत जन्मदाखल्याची साक्षांकित सत्यप्रत पाठवणे अनिवार्य आहे अथवा ती स्वीकारली जाणार नाहीत. या पुरस्कारविषयी अधिक माहिती साहित्य अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२०२४ मध्ये १० कवितासंग्रह, ७ लघुकथा संग्रह, २ लेख आणि १ निबंध, १ कादंबरी, १ गझल आणि १ संस्मरण अशा एकूण १० पुस्तकांसाठी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.युवा पुरस्काराचे इतर विजेते नयनज्योती सरमा (आसामी), सुतापा चक्रवर्ती (बंगाली), सेल्फ मेड राणी बारो (बोडो) आणि हीना चौधरी (डोगरी) आहेत.
रिंकू राठोड (गुजराती), श्रुती बीआर (कन्नड), मोहम्मद अश्रफ झिया (काश्मिरी), अद्वैत साळगावकर (कोंकणी), रिंकी झा ऋषिका (मैथिली), आणि श्यामकृष्णन आर. (मल्याळम) यांचाही विजेत्यांमध्ये समावेश आहे.वायखोम चिंगखींगनबा (मणिपुरी), देविदास सौदागर (मराठी), सूरज चापागाई (नेपाळी), संजय कुमार पांडा (ओडिया), रणधीर (पंजाबी), सोनाली सुतार (राजस्थानी) यांचीही युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.