मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Satara Band News) उरणची हिंदूकन्या यशश्री शिंदे आणि धारावीतील बजरंद दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची काही जिहाद्यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. ०२ ऑगस्ट रोजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातारा बंदची हाक पुकारण्यात आली होती. जवळपास ८० ते ९० टक्के साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्तम प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे 'सुरक्षित बहीण योजना' यासंदर्भात एखादा कायदा आणावा. त्याचप्रमाणे जिहाद्यांनाही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी विहिंप आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात विजय कृष्णा गाढवे (सातारा जिल्हा अध्यक्ष, विहिंप) यांनी सांगितले.