....तरीही देशात वायू प्रदूषणाचे हजारो बळी; 'लॅन्सेट'चा अहवाल काय, जाणून घ्या!

04 Jul 2024 15:25:39
air pollution lancet report


नवी दिल्ली :   
     जगभरात पर्यावरणीय समस्या गंभीर रुप धारण करत असताना देशात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी हजारो बळी जात असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 'लॅन्सेट'द्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या अहवालातून देशातील स्वच्छ शहरांसह वायू प्रदूषणामुळे वर्षाला साधारण ३३ हजार लोकांना जीव गमवावा लागत आहे. या संशोधनात २००८ ते २०१९ या कालावधीत संशोधकांनी ३.६ दशलक्ष मृत्यूंची नोंद केली आहे.

दरम्यान, देशातील हवेच्या गुणवत्तेच्या मर्यादेच्या खालीही दिसून आलेले लक्षणीय परिणाम चिंताजनक आहेत, असे सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्हचे सहकारी व अभ्यास प्रमुख भार्गव कृष्णा यांनी म्हटले आहे. कदाचित प्रदुषके मोजण्याची मानके असायला हवीत त्यापेक्षा जास्त ठेवली आहेत, असेही कृष्णा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

वायू प्रदूषण पीएम २.५ कण मानक वितरणाच्या तपशीलावर कर्करोगास कारणीभूत प्रदूषकांचे संयुग इतके लहान ते रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. विशेष म्हणजे कणांच्या उच्च पातळीच्या ४८ तासांपेक्षा कमी कालावधीच्या संपर्कात सामूहिक स्तरावर आयुर्मान बिघडू शकते.


deaths due to pollution 


जाणून घ्या पीएम २.५ बाबत

पीएम २.५ हा एक प्रकारचा वायू प्रदुषक आहे. ज्यामध्ये २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा लहान कण असतात. हे कण इतके लहान असतात की श्वास घेताना ते फुफ्फुसात खोलवर पोहोचतात. त्यामुळेच वायू प्रदूषण आणि त्याचे नकारात्मक परिणाम आरोग्यासाठी मुख्य कारण मानले जातात. अशा प्रदूषणाच्या स्त्रोतांमध्ये वाहनांचे एक्झॉस्ट आणि औद्योगिक उत्सर्जन यांचा समावेश होतो.

संशोधकांनी सांगितले की, भारतातील शहरांमध्ये दररोज पीएम २.५ प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने मृत्यूचा धोका वाढतो, अशी माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधनात बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी आणि सेंटर फॉर क्रॉनिक डिसीज, नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञांचा समावेश आहे.








Powered By Sangraha 9.0